शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 10:13 IST

"पवार ठाकरेंची माती करतील"

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘उद्धव ठाकरेंनी म्हणावे रात गई बात गई, आम्ही त्यांना बरोबर घेऊ. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहे ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणारे नाहीत,’ असे सूचित करत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ठाकरे यांनी विचार करावा, शरद पवार त्यांच्या पक्षाची माती करतील असे सांगितले.

ठाकरे यांनी पुन्हा भाजपबरोबर येण्याचे काही संकेत दिले आहेत का, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणाऱ्यातले नाहीत. 

मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रात गई बात गई असे म्हणायला हवे. त्यांनी ३३ महिने त्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. एकदाही त्यांनी घरी या, एकत्र बसू असे म्हटलेले नाही.”  शरद पवार यांच्या मागे गेल्याने अनेक नेत्यांची माती झाली. तसेच ते पक्ष म्हणून ठाकरेंचीही माती करतील असे म्हणत पाटील यांनी पवार यांनाही लक्ष्य केले.

उद्धव यांनीच मोदींशी जुळवून घ्यावे : केसरकर

कोल्हापूर : ‘उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले व त्यांना दिलेले वचनही ठाकरे यांनी मोडल्याने पंतप्रधानांचा अपमान झाला. त्यामुळे लहान भाऊ म्हणून ठाकरे यांनीच मोदी यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. आम्ही त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न केले, परंतु ते घडले नाही,’ असे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर