शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सार्वजनिक उपद्रवाबद्दल ठाकरेंवर गुन्हा नोंदवावा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:46 IST

एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, दौरे व राज्यातील ठिकठिकाणी भेटी देण्यास ठाकरे व राऊत यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी  सार्वजनिक उपद्रव केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा व या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, दौरे व राज्यातील ठिकठिकाणी भेटी देण्यास ठाकरे व राऊत यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे. राजकीय पेचप्रसंगांनंतर ठाकरे व राऊत यांनी धमक्या दिल्यानंतर बंडखोर नेते सुरक्षिततेसाठी गुवाहाटीला पळून गेले, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवसैनिकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केल्याने सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला, असा आरोप केला आहे.पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे की, राज्यात दंगल आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. ठाकरे व राऊत यांच्या दबावामुळे आणि चिथावणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला. केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. याचाच अर्थ, राज्यात शांततेचा भंग झाला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना द्यावेत, अशीही मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCourtन्यायालय