शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोरी करणाऱ्यांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 06:49 IST

Uddhav Thackeray: ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे.

मुंबई : ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. काही जण म्हणत होते की मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. मला या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही. तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. बंडखोर आमदारांसंदर्भात ते म्हणाले की, तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळे आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेले ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठे केले त्यांची स्वप्ने मोठी झाली. ती मी पूर्ण करू शकत नाही. त्यांनी जावे.

सध्या जे चालले आहे तो भाजपचा डाव आहे. मी वर्षा निवासस्थान सोडले म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा कधी विचार केला नव्हता. त्या पदाचा कधीच मोह मला नव्हता. एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गुजरातला गेल्यानंतर काही आमदारांना बोलाविण्यात आले होते. यावेळी काही झाले तरी सोडणार नाही असे ते म्हणाले. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचे करायचे काय अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपासोबत जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी कधीच बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही, असेही ते म्हणाले.

आता आदित्यही बडवा आहे का?आपण प्रत्येक वेळी यांना महत्त्वाची खाती दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते पण ते मी यांना दिले. माझ्याकडे साधीच खाती ठेवली. आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि मी बडवा होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे का? यांच्या मुलाला खासदार केले मग माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का?      - उद्धव ठाकरे

पक्षप्रमुखपदही सोडायला तयार म्हणत झाले भावुक...जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे असे समजा, असे आवाहनही त्यांनी केले. तुम्हाला जिथे भवितव्य दिसत असेल तिथे खुशाल जा मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी आनंदाने शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याचे सांगताना ते भावुक झाले.

स्वत:ची किंमत लावून गेले त्यांना किती किंमत द्यावी?स्वत:ची किंमत लावून तिकडे गेलेल्यांना किती किंमत द्यायची अशी बोचरी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केली. मित्रपक्षांनी धोका दिला नाही पण आम्ही ज्यांना मोठे केले त्यांनी धोका दिला. शिवसेना पक्षप्रमुखांना कोरोना असताना त्यांनी धोका दिला. आयपीएलचे ऑक्शन होते तसे यांचे तिकडे झाले की काय असा सवालही आदित्य यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण