शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

“अल्पावधीत ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले”; उद्धवसेनेच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:09 IST

Uddhav Thackeray Group News: उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील जनता आणि शिवसैनिक सक्षम आहे, असे प्रत्युत्तर ठाकरे गटातील नेत्यांनी नारायण राणेंना दिले आहे.

Uddhav Thackeray Group News: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासह नितेश राणे आणि निलेश राणे ठाकरे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राणे कुटुंबीय आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच असल्याचे पाहायला मिळते. यातच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी काय केले, याची एक यादीच वाचून दाखवली.

कोकणातील माणसांनी उद्योगधंदे करावेत हा प्रयत्न आम्ही करत आहोत. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा. ते कोकणात येणारही नाही, नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देईन. त्यांनी किती पैसे सिंधुदुर्गला दिले? असाही खडा सवाल करत, कोकणात उद्धव ठाकरे येतात, ते फक्त मासे मटण वडे खाण्यापुरतेच येतात, म्हणून मी येथील व्यवसायिकांना सांगितले आहे. ते येणार असतील, त्या दिवशी मटण वडे, मासे बंद ठेवा, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली होती. याला आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी रोखठोक शब्दांत उत्तर दिले आहे.

अल्पावधीत उद्धव ठाकरेंनी कोकणाला भरभरून दिले

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांना कालावधी कमी मिळाला. परंतु, कोरोना काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव ठाकरेंनी मंजूर केले. ते आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे. जेव्हा भयानक वादळ झाले होते, त्यावेळी स्वतः नारायण राणे केंद्रीय मंत्री होते. केंद्राची मदत येणार असे त्यांनी सांगितले होते. परंतु, फुटकी दमडी आली नाही आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वादळाच्या वेळी कोट्यवधी रुपयांची मदत मच्छीमारांना तसेच शेतकऱ्यांना केली आहे. याच उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. चिपीसारखे विमानतळ सुरू केले, ज्याचे उद्घाटनही उद्धव ठाकरे यांनीच केले. ते तुम्हाला चालविता येत नाही, असा पलटवार वैभव नाईक यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील जनता सक्षम

तुम्ही अनेक वर्षे मंत्री होतात, मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करणे आपल्याला जमले नाही. या महामार्गाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी केले, जे काम संपत आलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी थोड्याच कालावधीमध्ये कोकणासाठी भरभरून दिले आहे आणि त्यांचा पाहुणचार करण्यास आम्ही सक्षम आहोत. तुम्ही सत्तेत आहात तर निश्चितपणे एवढा माज सत्तेचा आणू नका. उद्धव ठाकरे येतील त्यावेळी कोकणातील जनता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. कारण त्यांनीच तुमच्यासकट अनेक लोकांना पदे दिली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची, त्यांच्या पाहुणचाराची मुळीच काळजी करू नका. उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील शिवसैनिक आणि जनता सक्षम आहे, असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आपण मंत्री झालात हे जनतेच्या विकासासाठी झाला आहात. ज्या भाजपाने मंत्री केले, त्या भाजपाला सवाल आहे की, यांना सातत्याने पक्ष फोडण्यासाठी, आपल्या पक्षात आले तर विकासनिधी देण्यासाठी, बदला घेण्यासाठी यांना मंत्री केले काय? आपण मंत्री झाला तर लोकांची कामे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सातत्याने गरळ ओकताय आणि त्याचा हिशेब जनता येत्या काळात करेल. जनताच त्याचा बदला घेईल. अशा धमक्यांना भीक घालणार नाही, या शब्दांत वैभव नाईक यांनी राणेंना उत्तर दिले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक Narayan Raneनारायण राणे Narayan Raneनारायण राणे