शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “मोदींचे नियुक्तीपत्र वाटून राजकारण, इथे रोजगार मेळाव्याची कामे नगरसेवक, शाखाप्रमुख करतात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:26 IST

Maharashtra News: बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच भू्मीपुत्रांना रोजगार देण्यासाठी केली होती. मात्र, अशी पत्रके कधी वाटली नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने भाजपसह केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील सुमारे ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रे देणार असून, रोजगार मेळावा अंतर्गत सरकारी विभागात नोकरी मिळालेल्या तरुणांना ही नियुक्ती पत्रे देण्यात येत आहेत. यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान आता नियुक्तीपत्र वाटून राजकारण करत आहेत. अशाप्रकारे नियुक्तीपत्र वाटण्याचे काम आमच्याकडे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या स्थरावर रोजगार मेळावे आयोजित केले जातात आणि त्यांना नियुक्तीपत्र वाटण्याचं कामही नगरसेवक आणि शाखाप्रमुखद्वारे केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच भू्मीपुत्रांना रोजगार देण्यासाठी केली होती. मात्र, त्यांनी अशी पत्रके कधी वाटली नाहीत, त्यांनी ८० टक्के स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी कायदा केला, असे संजय राऊत म्हणाले. 

संविधान आपल्याकडून हिसकवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळवून दिले. मात्र, तेच संविधान वाचण्यासाठी लढा द्यावा लागतोय, हे बाबासाहेबांचे दुर्देव आहे. देशात संविधान बचाव असे नारे ऐकू येतात. लोकशाहीचे दमन होत आहे. नागरी स्वातंत्र चिरडले जात आहे. जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिले, ते संविधान आपल्याकडून हिसकवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे हे शिवसैनिकाचे वर्णन असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होते. यांना दाढी असेल तर ते शौर्य यांनी दाखवले पाहिजे. मात्र, ते घाबरून गेले आणि इतरांनाही घाबरवले, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत