शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

Maharashtra Politics: “सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का? रामाचे सत्यवचन तुम्ही कुठून आणणार?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 12:15 IST

Maharashtra News: राज्यातील भाजप नेते कधी अयोध्येला गेल्याचे दिसले नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याची टीका संजय राऊतांनी केली.

Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेलेत. शिंदे गटासह भाजपचे अनेक आमदार, मंत्री अयोध्येला गेले. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अचानक अयोध्येत दाखल झाले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे ढोंग असून, त्यांना श्रीरामाचा आशिर्वाद लाभणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेले, अशी सडकून टीका संजय राऊतांनी केली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचे दिसले नाही. आम्ही सातत्याने जात आहोत. तेथील मंदिरासाठीआम्ही संघर्ष केला. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का? 

रामाचे जे सत्य वचन आहे ते तुम्ही कुठून घेणार? तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण जाली नाही का? तेव्हा तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामाने असत्याच्या बाजूने कौल दिला नसता, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. तसेच गेल्या ७२ तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडाला आहे. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि काही भूमिका घेऊ असे सरकारने सांगितले होते. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून तुम्ही गेला आहात, असे टीकास्त्र संजय राऊतांनी सोडले. 

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर काही बोलायचे नाही. पण गौतम अदानी प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या प्रश्नाची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्य समोर येणे गरजेचे असल्याची विरोधकांची मागणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे