शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का? रामाचे सत्यवचन तुम्ही कुठून आणणार?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 12:15 IST

Maharashtra News: राज्यातील भाजप नेते कधी अयोध्येला गेल्याचे दिसले नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याची टीका संजय राऊतांनी केली.

Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेलेत. शिंदे गटासह भाजपचे अनेक आमदार, मंत्री अयोध्येला गेले. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अचानक अयोध्येत दाखल झाले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे ढोंग असून, त्यांना श्रीरामाचा आशिर्वाद लाभणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेले, अशी सडकून टीका संजय राऊतांनी केली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचे दिसले नाही. आम्ही सातत्याने जात आहोत. तेथील मंदिरासाठीआम्ही संघर्ष केला. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का? 

रामाचे जे सत्य वचन आहे ते तुम्ही कुठून घेणार? तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण जाली नाही का? तेव्हा तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामाने असत्याच्या बाजूने कौल दिला नसता, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. तसेच गेल्या ७२ तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडाला आहे. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि काही भूमिका घेऊ असे सरकारने सांगितले होते. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून तुम्ही गेला आहात, असे टीकास्त्र संजय राऊतांनी सोडले. 

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर काही बोलायचे नाही. पण गौतम अदानी प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या प्रश्नाची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्य समोर येणे गरजेचे असल्याची विरोधकांची मागणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे