शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

'तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड...'; एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:47 IST

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले हेच पंतप्रधान मोदींचे यश आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचे काम केले. देशात २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढले तर ८० टक्के लोकांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोदींना पर्याय नाही. त्यामुळे यावेळी अब की बार ४५ पारचा नारा यशस्वी करून दाखवावा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोडून बोला मुख्यमंत्री महोदय...माझ्यासाहित तुम्हाला देखील पोलिओ डोस काँग्रेस सरकारच्या कालखंडात दिले गेले. मग तो डोस काँग्रेसने किंवा तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिलेला होता का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तसेच वंदे भारत, राम मंदिर या दोन गोष्टी देशातील जनतेच्या घामा कष्टाच्या पै-पै जमवून झालेल्या आहेत. महाशक्तीच्या खिशातील पैशाने नाही, हे लक्षात ठेवा, असं अंबादान दानवे म्हणाले. तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड, सध्या एवढे केले तरी खूप आहे महाराष्ट्रासाठी. राहता राहिला प्रश्न फुकट धान्याचा.. या देशातील लोक फुकट धान्य मागत नाही येत. त्यांच्या पिकाला वाजवी दाम मागतात ते! ते तुमच्या सरकारकडून होणे नाही, असा निशाणा अंबादास दानवे यांनी साधला.

रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली-

रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपाच्या बापाची नाही. रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली. दोन-चार नवीन ट्रेन तुम्ही सुरू केल्या, त्या मालकीच्या आहेत का, देश तुमच्या मालकीचा आहे का, या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची नाही. भाजपावाले मुर्ख आहेत. त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून हल्लाबोल केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmbadas Danweyअंबादास दानवे