शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व

By अरुण आडिवरेकर | Updated: October 17, 2022 18:50 IST

तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती.

रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. त्यामुळे तालुक्यात शिंदे गट वर्चस्व राखणार की, उद्धव ठाकरे गट याची उत्सुकता हाेती. या निवडणुकांमध्ये शिरगाव, पाेमेंडी बुद्रुक आणि फणसाेप ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या सरपंच विराजमान झाल्या आहेत.

तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी ताकद लावली हाेती. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले हाेते. याठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. 

महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी ३०० मतांनी विजयी झाल्या. त्यांना २ हजार ६० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार माेरे यांना १७०० आणि कुमठेकर यांना १७५० मते मिळाली. मात्र, ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने वर्चस्व राखले.

पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीतही उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या.

फणसोप ग्रामपंचायतीवरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मते मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मते मिळाली.

राधिका साळवी या ३६४

मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली आहे.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे