शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व

By अरुण आडिवरेकर | Updated: October 17, 2022 18:50 IST

तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती.

रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. त्यामुळे तालुक्यात शिंदे गट वर्चस्व राखणार की, उद्धव ठाकरे गट याची उत्सुकता हाेती. या निवडणुकांमध्ये शिरगाव, पाेमेंडी बुद्रुक आणि फणसाेप ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या सरपंच विराजमान झाल्या आहेत.

तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी ताकद लावली हाेती. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले हाेते. याठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. 

महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी ३०० मतांनी विजयी झाल्या. त्यांना २ हजार ६० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार माेरे यांना १७०० आणि कुमठेकर यांना १७५० मते मिळाली. मात्र, ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने वर्चस्व राखले.

पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीतही उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या.

फणसोप ग्रामपंचायतीवरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मते मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मते मिळाली.

राधिका साळवी या ३६४

मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली आहे.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे