शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व

By अरुण आडिवरेकर | Updated: October 17, 2022 18:50 IST

तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती.

रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. त्यामुळे तालुक्यात शिंदे गट वर्चस्व राखणार की, उद्धव ठाकरे गट याची उत्सुकता हाेती. या निवडणुकांमध्ये शिरगाव, पाेमेंडी बुद्रुक आणि फणसाेप ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या सरपंच विराजमान झाल्या आहेत.

तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी ताकद लावली हाेती. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले हाेते. याठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. 

महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी ३०० मतांनी विजयी झाल्या. त्यांना २ हजार ६० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार माेरे यांना १७०० आणि कुमठेकर यांना १७५० मते मिळाली. मात्र, ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने वर्चस्व राखले.

पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीतही उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या.

फणसोप ग्रामपंचायतीवरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मते मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मते मिळाली.

राधिका साळवी या ३६४

मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली आहे.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे