शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

“मंत्र्यांचे पगार, बंगले नुतनीकरणास निधी, पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:32 IST

Aaditya Thackeray News: निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले हे सरकार जनतेचे भले करणारे नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारे आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Aaditya Thackeray News: गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५६ टक्के पगारापर्यंत अनेकविध गोष्टींवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य जनतेसाठी सरकारकडे पैसा नाही, पण मंत्र्यांच्या कामांसाठी तिजोरीतून भरघोस निधी दिला जात आहे, अशा आशयाची तुलनाच आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की, एसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच पगार दिला जात असल्याचे गेल्या आठवड्यात आपण पाहिले, तसेच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल होणार असे दिसत आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधी नाही, लाडक्या बहीणींना निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निधी नाही, आरोग्य व्यवस्था, औषधांचा पुरवठा ह्यासाठी निधी नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

जनतेचे भले करणारे नाही, स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार

परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे, उपमुख्यमंत्री कोल्हापुरात म्हणाले, तसे मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे, लाडक्या कंत्राटदारांसाठी निधी आहे, भव्यदिव्य सोहळ्यांसाठी निधी आहे, जाहिरातींसाठी निधी आहे. नवीन एसटी बसेस घेण्यासाठी, म्हणजेच कंत्राटांसाठी निधी आहे. ह्यातून काय दिसतंय? निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले हे सरकार जनतेचे भले करणारे सरकार नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार आहे!, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.

दरम्यान, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना जे लोक रस्त्यावर आणत होते, ते लोक आता शांत का आहेत? ते लोक का सरकारला का विचारणा करत नाहीत? एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोण उत्तरे देणार? असे एकामागून एक प्रश्न आदित्य ठाकरेंनी यापूर्वी उपस्थित केले होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे