शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

अ‍ॅक्शन मोडमध्ये ठाकरे सरकार; मंत्रालयातून आता दररोज चालणार कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 22:44 IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी बेधडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी बेधडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस चालणारं मंत्रालयीन काम आता दररोज सुरू राहणार आहे. जवळपास 25 वर्षांनंतर मंत्रालयातील कामकाज दररोज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आठवड्यातून कधीही येऊन जनतेला आपले प्रश्न आणि व्यथा मंत्र्यांसमोर मांडता येणार आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर ठाकरे दररोज मंत्रालयात जातीनं उपस्थिती दर्शवतात. त्यांचा हा आदर्श इतर सहाही मंत्र्यांना घ्यावा लागणार असून, त्यांनाही मंत्रालयात दररोज यावं लागणार आहे. तसेच आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी उद्धव ठाकरे मंत्र्यांची एक बैठक बोलावणार असून, त्यात सर्व महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहेत. राजकीय दौरे आणि कार्यक्रमांचा अपवाद सोडल्यास उद्धव ठाकरे मंत्रालयात दररोज येणार आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात मंगळवारची कॅबिनेट बैठक व्हायची. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मंत्रालयात उपस्थिती दर्शवायचे. त्यामुळे मंत्रालयातील कामकाज संथ गतीनं सुरू असायचे, पण उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानं मंत्रालयातील कामकाजाला वेग येणार आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आदी माजी मुख्यमंत्री मुंबईतले नसल्यानं त्यांची मंत्रालयात फार ये-जा नसायची. ठरावीक दिवशीच ते मंत्रालयात भेट द्यायचे. पण मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या कार्यकाळात मंत्रालय दररोज सुरू असायचं. कारण हे दोन्ही मंत्री मुंबईचे असल्यानं ते मंत्रालयात दररोज हजेरी लावायचे. दुसरीकडे फडणवीस नागपूरचे असल्याने ते सतत विदर्भाच्या दौऱ्यावर असायचे. त्यामुळे मंत्रालयात फार लोकांची ये-जा नसायची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही मुंबईतल्या मातोश्रीमध्ये वास्तव्य आहे. त्यामुळे तेसुद्धा दररोज मंत्रालयात उपस्थित राहणार असून, मंत्रालयीन कामकाजाला वेग येणार आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे