शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्शन मोडमध्ये ठाकरे सरकार; मंत्रालयातून आता दररोज चालणार कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 22:44 IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी बेधडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी बेधडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस चालणारं मंत्रालयीन काम आता दररोज सुरू राहणार आहे. जवळपास 25 वर्षांनंतर मंत्रालयातील कामकाज दररोज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आठवड्यातून कधीही येऊन जनतेला आपले प्रश्न आणि व्यथा मंत्र्यांसमोर मांडता येणार आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर ठाकरे दररोज मंत्रालयात जातीनं उपस्थिती दर्शवतात. त्यांचा हा आदर्श इतर सहाही मंत्र्यांना घ्यावा लागणार असून, त्यांनाही मंत्रालयात दररोज यावं लागणार आहे. तसेच आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी उद्धव ठाकरे मंत्र्यांची एक बैठक बोलावणार असून, त्यात सर्व महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहेत. राजकीय दौरे आणि कार्यक्रमांचा अपवाद सोडल्यास उद्धव ठाकरे मंत्रालयात दररोज येणार आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात मंगळवारची कॅबिनेट बैठक व्हायची. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मंत्रालयात उपस्थिती दर्शवायचे. त्यामुळे मंत्रालयातील कामकाज संथ गतीनं सुरू असायचे, पण उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानं मंत्रालयातील कामकाजाला वेग येणार आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आदी माजी मुख्यमंत्री मुंबईतले नसल्यानं त्यांची मंत्रालयात फार ये-जा नसायची. ठरावीक दिवशीच ते मंत्रालयात भेट द्यायचे. पण मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या कार्यकाळात मंत्रालय दररोज सुरू असायचं. कारण हे दोन्ही मंत्री मुंबईचे असल्यानं ते मंत्रालयात दररोज हजेरी लावायचे. दुसरीकडे फडणवीस नागपूरचे असल्याने ते सतत विदर्भाच्या दौऱ्यावर असायचे. त्यामुळे मंत्रालयात फार लोकांची ये-जा नसायची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही मुंबईतल्या मातोश्रीमध्ये वास्तव्य आहे. त्यामुळे तेसुद्धा दररोज मंत्रालयात उपस्थित राहणार असून, मंत्रालयीन कामकाजाला वेग येणार आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे