शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गणितासह भाषेची कसोटी

By admin | Updated: July 5, 2016 01:29 IST

विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार

मुंबई : विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ही पायाभूत चाचणी घेण्यात येणार असून, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी असणार आहे.विद्यार्थ्यांचे ‘गणित’ आणि ‘भाषा’ हे विषय कितपत पक्के आहेत? याचा आढावा याद्वारे लेखी स्वरूपात घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील खासगी, अनुदानित, विना-अनुदानित, अल्पसंख्याक शाळांना पायाभूत चाचणी घेणे बंधनकारक राहणार आहे. यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे राज्यभरातील शाळांना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार असून, शाळेने २४ ते ३० जुलै या कालावधीत ही चाचणी घेणे अनिवार्य असणार आहे. गणित आणि भाषा विषयांवर आधारित ही चाचणी आहे. विद्यार्थ्यांना या विषयातील कितपत ज्ञान आहे, हे पाहण्यासाठी चाचणी घेतली जाते. या चाचणीतून विद्यार्थ्यांचा त्या विषयातील अभ्यास कितपत आहे ते कळते. (प्रतिनिधी)इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत अशी भीती पालकांना होती. या पायाभूत चाचणीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची एक प्रकारे उजळणीच होणार आहे.- विद्या चव्हाण, पालकपायाभूत चाचणी परीक्षेचा फायदाच झाला आहे. मुलांना गणित आणि भाषा विषयाचे ज्ञान आहे की नाही? हे शिक्षकांसोबत पालकांनासुद्धा कळते. या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना विशेष अभ्यास करावा लागत नाही, अगदी साध्या-सोप्या आणि झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. याचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.- स्मिता बटा, पालकगेल्या वर्षी सहावीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येची बेरीज; असे प्रश्न विचारण्यात आले होते. सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. तरच या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिवाय पायाभूत चाचणीत ‘ड’ श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काही विशेष तरतुदी कराव्यात.- अनिता विचारे, शिक्षिका, पराग विद्यालय