शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:08 IST

शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.

विशेष प्रतिनिधी नागपूर : शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज एकरकमी फेडल्यास दीड लाखाची कर्जमाफी देण्यात येते. हे वरचे कर्ज फेडण्याची मुदत ३१ डिसेंबर होती. ती आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. कर्जमाफी, बोंडअळी आदी शेतकºयांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बोंडअळी, तुडतुडा रोगाने झालेले नुकसान, दुष्काळासंदर्भात मदतीची घोषणा विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी करण्यात येईल.नागरी सहकारी बँकांनी दिलेले पीककर्ज हे माफीच्या कक्षेत आणण्याबाबत माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल. काही बहुभूधारक शेतकरी कर्जमाफीतून सुटले असतील तर त्यांना कर्जमाफी देण्याचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. २००८मध्ये यूपीएच्या काळात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत दिलेल्या कर्जमाफीत झालेले घोटाळे लेखा परीक्षणात समोर आले होते. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांमधून शिकूनच आम्ही पारदर्शक कर्जमाफी आणली आहे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, अब्दुल सत्तार, भाजपाचे संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केले.४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर -राज्यात आजच्या दिवशी एकूण २६ लाख शेतकºयांना २३ हजार ३०० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ६७ लाख अर्जदार शेतकºयांपैकी ४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.काही साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या नावावर कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. त्यांनी या कर्जापोटी कॉर्पोरेट हमी दिली नसेल तर अशा कारखान्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस