शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:08 IST

शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.

विशेष प्रतिनिधी नागपूर : शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज एकरकमी फेडल्यास दीड लाखाची कर्जमाफी देण्यात येते. हे वरचे कर्ज फेडण्याची मुदत ३१ डिसेंबर होती. ती आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. कर्जमाफी, बोंडअळी आदी शेतकºयांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बोंडअळी, तुडतुडा रोगाने झालेले नुकसान, दुष्काळासंदर्भात मदतीची घोषणा विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी करण्यात येईल.नागरी सहकारी बँकांनी दिलेले पीककर्ज हे माफीच्या कक्षेत आणण्याबाबत माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल. काही बहुभूधारक शेतकरी कर्जमाफीतून सुटले असतील तर त्यांना कर्जमाफी देण्याचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. २००८मध्ये यूपीएच्या काळात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत दिलेल्या कर्जमाफीत झालेले घोटाळे लेखा परीक्षणात समोर आले होते. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांमधून शिकूनच आम्ही पारदर्शक कर्जमाफी आणली आहे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, अब्दुल सत्तार, भाजपाचे संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केले.४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर -राज्यात आजच्या दिवशी एकूण २६ लाख शेतकºयांना २३ हजार ३०० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ६७ लाख अर्जदार शेतकºयांपैकी ४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.काही साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या नावावर कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. त्यांनी या कर्जापोटी कॉर्पोरेट हमी दिली नसेल तर अशा कारखान्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस