शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:08 IST

शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.

विशेष प्रतिनिधी नागपूर : शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज एकरकमी फेडल्यास दीड लाखाची कर्जमाफी देण्यात येते. हे वरचे कर्ज फेडण्याची मुदत ३१ डिसेंबर होती. ती आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. कर्जमाफी, बोंडअळी आदी शेतकºयांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बोंडअळी, तुडतुडा रोगाने झालेले नुकसान, दुष्काळासंदर्भात मदतीची घोषणा विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी करण्यात येईल.नागरी सहकारी बँकांनी दिलेले पीककर्ज हे माफीच्या कक्षेत आणण्याबाबत माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल. काही बहुभूधारक शेतकरी कर्जमाफीतून सुटले असतील तर त्यांना कर्जमाफी देण्याचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. २००८मध्ये यूपीएच्या काळात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत दिलेल्या कर्जमाफीत झालेले घोटाळे लेखा परीक्षणात समोर आले होते. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांमधून शिकूनच आम्ही पारदर्शक कर्जमाफी आणली आहे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, अब्दुल सत्तार, भाजपाचे संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केले.४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर -राज्यात आजच्या दिवशी एकूण २६ लाख शेतकºयांना २३ हजार ३०० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ६७ लाख अर्जदार शेतकºयांपैकी ४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.काही साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या नावावर कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. त्यांनी या कर्जापोटी कॉर्पोरेट हमी दिली नसेल तर अशा कारखान्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस