शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तेंदुपत्ता व्यवसायाचा ३०० काेटींचा पल्ला! मागील वर्षीच्या तुलनेत भाव अधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:51 IST

कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या विस्कळीतपणानंतर यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता व्यवसाय सुरळीत झाला आहे.

गडचिराेली :कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या विस्कळीतपणानंतर यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता व्यवसाय सुरळीत झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी तेंदूपत्त्याच्या व्यवसायात ३०० काेटींच्या वर उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

कोरोनानंतर सावरला तेंदुपत्ता1. गेली दोन वर्षे काेराेना साथीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. राष्ट्रीय बाजारपेठेतही तेंदूपत्त्याचा तुटवडा निर्माण झाला हाेता. परिणामी ज्या व्यापाऱ्यांकडे जुना तेंदूपत्ता शिल्लक हाेता, त्याला दामदुप्पट भाव मिळाला. 2. यावर्षी काेराेनाचे संकट नसल्याने जवळपास सर्वच ग्रामसभांचा तेंदूपत्ता विकला गेला. बहुतांश ग्रामसभांना प्रति स्टँडर्ड बॅग (एक हजार तेंदूपत्ता पुडे) १० हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला.  

वनविभागाला १२ काेटींचा महसूल- वनविभागाकडे तेंदूपत्त्याचे  केवळ ३० युनिट - या युनिटमधून ४१ हजार ३४५ स्टँडर्ड बॅग तेंदूपत्ता संकलन - यातून वनविभागाला ११ काेटी ८० लाख ३१ हजार रुपयांची राॅयल्टी मिळाली 

पावसानेही दिली साथ  तेंदूपत्त्याचा व्यवसाय जवळपास मे महिन्याचा पहिला आठवडा ते जून महिन्याचा पहिला आठवडा या कालावधीपर्यंत चालताे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तेंदूपत्त्याची उचल करून गाेदामामध्ये साठवणूक केली जाते. या कालावधीत पाऊस झाल्यास तेंदूपत्ता भिजून माेठे नुकसान हाेते. मात्र यावर्षी अजूनपर्यंत पाऊस आला नसल्याने नुकसान टळले आहे.गडचिराेलीच्या तेंदुपत्त्याला विशेष पसंतीराज्यात गाेंदिया, चंद्रपूरसह तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्येसुद्धा तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. मात्र गडचिराेली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, धानाेरा या तालुक्यांमधील तेंदूपत्ता आकाराने माेठा आहे. तसेच दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांमधील व्यापारी तेंदूपत्ता संकलनासाठी गडचिराेली जिल्ह्यात येतात.

टॅग्स :businessव्यवसाय