दहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली

By Admin | Published: October 14, 2016 03:24 AM2016-10-14T03:24:35+5:302016-10-14T03:24:35+5:30

राज्य सरकारने आज १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. केंद्रीय सेवेत असलेले विपिन इटनकर यांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे सहजिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प

Ten IAS officers transferred | दहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली

दहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली

googlenewsNext

मुंबई : राज्य सरकारने आज १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. केंद्रीय सेवेत असलेले विपिन इटनकर यांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे सहजिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प संचालक या पदावर पाठविण्यात आले आहे.
केंद्रीय सेवेत असलेले जलज शर्मा यांना जळगाव उपविभाग; जळगाव येथे सहजिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आलेय. केंद्रीय सेवेतील आणखी एक अधिकारी एम.आर. दयानिधी हे राजुरा उपविभाग जि. चंद्रपूर येथील नवे सहजिल्हाधिकारी तसेच चंद्रपूरचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असतील. याच प्रमाणे केंद्रातून आलेल्या निमा अरोरा यांना नंदुरबार उपविभाग येथे सहजिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारीपदी नेमण्यात आले आहे. याच पदांवर पवनीत कौर जव्हार तर आचल गोयल या डहाणू येथे जात आहेत. पृथ्वीराज बी.पी. मोरगाव अर्जुनी येथे सहजिल्हाधिकारी, विजय राठोड हे दर्यापूर येथे सहजिल्हाधिकारी, अमोल येडगे हे बीड उपविभाग येथे उपजिल्हाधिकारी म्हणून जात आहेत. मनीषा खत्री यांची बदली पाचोरा उपविभाग; जि. जळगाव येथे सहजिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ten IAS officers transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.