शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

ठाण्यात दहा प्रभाग समित्या बिनविरोध

By admin | Updated: April 30, 2016 03:10 IST

महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.

ठाणे : महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. या समित्यांवर शिवसेनेने आपले वर्चस्व यंदाही कायम राखले. शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, भाजपा आणि मनसेचे प्रत्येकी एकेक अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. मनसेला शिवसेनेमुळेच एक समिती मिळाली आहे. तर पाच विशेष समित्या शिवसेना आणि भाजपाला राखता आल्या आहेत. तर निवणूक काळात आयुक्तांशी हुज्जत घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नगरसेविका नंदा पाटील यांचे पती कृष्णा पाटील यांना अटक केली. सहा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी एक-एक अर्ज आला होता. त्यातच माजीवडा-मानपाडा, कोपरी आणि मुंब्रा येथे दोन-दोन अर्ज आल्याने येथे अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता होती. परंतु, निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने त्या समित्यांच्या अध्यक्षांची ही बिनविरोधच झाली. १० प्रभाग समितीमधील वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी उज्वला फडतरे, रायला देवी प्र.स.अध्यक्षपदी शान मनप्रित गुरूमुख सिंग, वागळे इस्टेट प्र.स.अध्यक्षपदी अश्विनी जगताप , नंदा पाटील (उथळसर), प्राजक्ता खाडे (लोकमान्यनगर, सावरकरनगर) या पाच प्रभाग समितींवर शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकला आहे. तर त्यांचा मित्र पक्ष असलेला भाजपाच्या वाट्याला नौपाडा प्रभाग समिती आली असून येथे भाजपाच्या सुहासिनी लोखंडे यांची निवड झाली आहे. तर कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मनिषा साळवी निवड झाली. तर माजिवडा -मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उषा भोईर आणि शिवसेनेच्या बिंदु मढवी यांचा अर्ज भरला होता. येथे शिवसेनेचे सहा नगरसेवक असून राष्ट्रवादीचे चार, एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. अपक्ष हा राष्ट्रवादीच्याच बाजूने असला तरी काँग्रेसचा एक नगरसेवक म्हणजेच जयनाथ पूर्णेकर यांचे मत येथे निर्णायक मानले जात होते. त्यांच्या मतावरच या समितीचे भवितव्य ठरणार होते. पंरतु, शुक्र वारी मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा भोईर यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या बिंदू मढवी यांची बिनविरोध निवड झाली. तर दुसरीकडे कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने तेथे काँग्रेसच्या मालती पाटील यांनी आणि मनसेतून राजश्री नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मनसेला शिवसेनेने पाठींबा दिल्याने ही प्रभाग समिती मनसेच्या वाटेला जाणार असे निश्चित मानले जात होते. येथील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे ३, भाजपा १, मनसे १ असे होते. तर काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादीचे २ असे तीनचे संख्याबळ काँग्रेसच्या बाजूने होते. त्यामुळेच येथे मनसेचा विजय होईल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती दरम्यान शुक्र वारी मतदानाच्या वेळी येथेही काँग्रेसच्या मालती पाटील यांनीही माघार घेतल्याने मनसेच्या राजश्री नाईक यांची बिनविरोध निवड झाली. या समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष्य हे मुंब्रा प्रभाग समितीकडे लागले होते. या समितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही आघाडीच्या मित्र पक्षामध्येच लढत होती. काँग्रेसने रेश्मा पाटील यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने पुन्हा अशरफ उर्फ शानु पठाण यांना उभे केले होते. पण मतदानाच्यावेळी काँग्रेसच्या रेश्मा पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे शानू पठाण यांची बिनविरोध निवड झाली. पाच विशेष समित्यांपैकी गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती - राजकुमार यादव (भाजपा),क्रीडा समिती - काशिनाथ राऊत (शिवसेना), शिक्षण समिती - प्रभा बोरीटकर, आरोग्य समिती - पुजा वाघ आणि महिला बालकल्याण समितीपदी विजया लासे यांची निवड झाली आहे. या निवडणूक अधिकारी म्हणून मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)