शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

आरक्षित जागांवर हंगामी भरती!

By admin | Updated: April 8, 2015 02:47 IST

मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या १६ टक्के जागा राज्य सरकारला रिकाम्या ठेवता येणार नाहीत़ अंतिम निर्णय होईपर्यंत त्या जागांवर हंगामी स्वरुपाची भरती केली जावी,

मुंबई : मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या १६ टक्के जागा राज्य सरकारला रिकाम्या ठेवता येणार नाहीत़ अंतिम निर्णय होईपर्यंत त्या जागांवर हंगामी स्वरुपाची भरती केली जावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले़ सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला याआधीच स्थगिती दिलेली असल्याने सरकारला या आरक्षित जागा रिकाम्या ठेवून उरलेल्या जागांवर भरती करता येणार नाही अथवा प्रवेश देता येणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिम समाजास आरक्षण देण्यासाठी वटहुकूम काढला. त्याविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या नोकरी व शिक्षणातील आणि मुस्लिमांच्या फक्त नोकऱ्यांमधील आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. नंतर सरकारने विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात या वटहुकुमाची जागा घेणारा कायदा केला. मात्र त्यातून मुस्लिमांचे आरक्षण वगळले. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा रिकाम्या ठेवल्या जातील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतला होता़ या पार्श्वभूमीवर याविषयीच्या याचिका पुढील सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आल्या तेव्हा सरकारी वकील अभिनंदन वाग्यानी यांनी आता सरकारने वटहुकुमाच्या जागी रीतसर कायदा केला आहे, असे सांगितले. त्यावर न्यायालयाने वटहुकुमाप्रमाणेच या नव्या कायद्यातील मराठा आरक्षणाच्या तरतुदीलाही स्थगिती दिली.यावेळी याचिकाकर्त्यांचे एक वकील अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांनी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या नांदेड आणि जळगाव जिल्ह्यांतील प्रत्येकी एका अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अनुक्रमे शैक्षणिक प्रवेश व कर्मचारी भरतीच्या जाहिरातीकडे लक्ष वेधले. यात मराठा आरक्षणाच्या जागा रिकाम्या ठेवल्याचे दाखविले होते. त्यासंदर्भात सरकारी वकिलाने मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा दाखला दिला. मात्र मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना त्या जागा त्यांच्यासाठी आरक्षित आहेत असे मानून रिकाम्या ठेवता येणार नाहीत. त्या जागा न्यायालयाच्या अंतिम निर्णयास अधीन राहून हंगामी स्वरूपात भरल्या जाव्यात, असे खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने केलेला हा खुलासा निदर्शनास आणलेल्या दोन जाहिरातींच्या संदर्भात केला असला तरी त्यामागचे सूत्र लक्षात घेता सरकारला नोकऱ्यांमध्ये मराठ्यांसाठी जागा रिकाम्या ठेवून नोकरभरती करता येणार नाही, असे मानले जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षित जागांवर ज्या विद्यार्थ्यांना स्थगितीपूर्वी प्रवेश दिले गेले आहेत ते कायम राहतील हे न्यायालयाने पूर्वीच स्पष्ट केलेले आहे. वटहुकुमाच्या जागी केलेल्या नव्या कायद्याची कारणमीमांसा स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारला करायला सांगून पुढील सुनावणी येत्या जुलैपर्यंत तहकूब केली गेली. (विशेष प्रतिनिधी)