शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

भ्रष्टाचार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची भिंत

By admin | Updated: April 27, 2015 04:09 IST

सरकारी कार्यालयातील दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचारामुळे सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि जनता यांच्यामध्ये तंत्रज्ञानाची भिंत उभी करून भ्रष्टाचाराला

संदीप प्रधान, मुंबईसरकारी कार्यालयातील दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचारामुळे सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि जनता यांच्यामध्ये तंत्रज्ञानाची भिंत उभी करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. यामुळेच सरकारच्या अनेक कार्यालयांत निविदा भरण्यापासून बिले मंजूर करण्यापर्यंत अथवा सेवा पुरवण्याकरिता संगणकाचा वापर सुरू झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथे तहसीलदार, वाहतूक कंत्राटदार, पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने ३० हजार क्विंटलचा धान्य घोटाळा झाल्याचे उघड झाले. एका तालुक्यात ३०० ट्रक धान्याचा घोटाळा होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. त्यामुळे आता या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाने ठरवले आहे.मुंबईतील गोदामातून धान्य घेऊन ट्रक निघाला की त्याची सूचना सचिवांसह सात जणांना दिली जाईल. हा ट्रक किती कालावधीत तेथे पोहोचला पाहिजे त्याची मुदत निश्चित केलेली असेल. ट्रकमध्ये किती धान्य आहे व त्यापैकी किती धान्य प्रत्यक्ष पोहोचले याचा तपशील सर्व संबंधितांना कळवला जाईल. हे तंत्रज्ञान दिल्लीतील एनआयसीकडून तयार करून घेतले आहे. जेणेकरून त्यामध्ये त्रुटी राहण्यास वाव नसेल, असे कपूर यांनी सांगितले. वाहतूक परवाने देणे, नूतनीकरण तसेच वाहनांना फिटनेसचे प्रमाणपत्र देणे अशा सर्वच कामांत असलेल्या बेसुमार भ्रष्टाचारामुळे परिवहन खाते बदनाम झाले असल्याने कॉम्युटराईज ट्रॅकवर चालकांची परीक्षा घेणे किंवा आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅकवर वाहनाच्या फिटनेसची चाचणी घेणे हे उपाय अपर मुख्यसचिव (परिवहन व बंदरे) गौतम चॅटर्जी यांनी करण्याचे ठरवले आहे. कपूर व चॅटर्जी हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकारी-कर्मचारी यांचा जनतेशी किमान संबंध यावा व परस्पर संगनमताला आळा बसावा याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह धरीत आहेत.एकेकाळी रोजगार हमीचे मस्टर कर्मचारी हाताळत होते. परंतु त्यानंतर अनेक घोटाळे उघडकीस आल्यावर तेथे संगणकाचा वापर सुरू झाला. सध्या तीन लाखांपेक्षा जास्त रकमेची टेंडर ही आॅनलाइन करण्यामागे ‘चहापाणी’ संस्कृती संपुष्टात आणणे हाच हेतू आहे. अनेक अनुदाने, शिष्यवृत्त्या थेट बँक खात्यात जमा करण्यामागे त्या देताना हात ओले करण्याची अपेक्षा धरण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल हीच अपेक्षा आहे. विक्रीकर, उत्पादन शुल्क, नोंदणी व मुद्रांक शुल्क, अन्न व औषध प्रशासन अशा बहुतांश कार्यालयांत सरकारी कर्मचारी व जनता यांचा संपर्क कमीतकमी करण्यामागे भ्रष्टाचाराला आळा घालणे हाच हेतू असल्याचे अनेक सनदी अधिकारी मान्य करतात.