शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

भ्रष्टाचार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची भिंत

By admin | Updated: April 27, 2015 04:09 IST

सरकारी कार्यालयातील दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचारामुळे सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि जनता यांच्यामध्ये तंत्रज्ञानाची भिंत उभी करून भ्रष्टाचाराला

संदीप प्रधान, मुंबईसरकारी कार्यालयातील दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचारामुळे सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि जनता यांच्यामध्ये तंत्रज्ञानाची भिंत उभी करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. यामुळेच सरकारच्या अनेक कार्यालयांत निविदा भरण्यापासून बिले मंजूर करण्यापर्यंत अथवा सेवा पुरवण्याकरिता संगणकाचा वापर सुरू झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथे तहसीलदार, वाहतूक कंत्राटदार, पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने ३० हजार क्विंटलचा धान्य घोटाळा झाल्याचे उघड झाले. एका तालुक्यात ३०० ट्रक धान्याचा घोटाळा होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. त्यामुळे आता या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाने ठरवले आहे.मुंबईतील गोदामातून धान्य घेऊन ट्रक निघाला की त्याची सूचना सचिवांसह सात जणांना दिली जाईल. हा ट्रक किती कालावधीत तेथे पोहोचला पाहिजे त्याची मुदत निश्चित केलेली असेल. ट्रकमध्ये किती धान्य आहे व त्यापैकी किती धान्य प्रत्यक्ष पोहोचले याचा तपशील सर्व संबंधितांना कळवला जाईल. हे तंत्रज्ञान दिल्लीतील एनआयसीकडून तयार करून घेतले आहे. जेणेकरून त्यामध्ये त्रुटी राहण्यास वाव नसेल, असे कपूर यांनी सांगितले. वाहतूक परवाने देणे, नूतनीकरण तसेच वाहनांना फिटनेसचे प्रमाणपत्र देणे अशा सर्वच कामांत असलेल्या बेसुमार भ्रष्टाचारामुळे परिवहन खाते बदनाम झाले असल्याने कॉम्युटराईज ट्रॅकवर चालकांची परीक्षा घेणे किंवा आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅकवर वाहनाच्या फिटनेसची चाचणी घेणे हे उपाय अपर मुख्यसचिव (परिवहन व बंदरे) गौतम चॅटर्जी यांनी करण्याचे ठरवले आहे. कपूर व चॅटर्जी हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकारी-कर्मचारी यांचा जनतेशी किमान संबंध यावा व परस्पर संगनमताला आळा बसावा याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह धरीत आहेत.एकेकाळी रोजगार हमीचे मस्टर कर्मचारी हाताळत होते. परंतु त्यानंतर अनेक घोटाळे उघडकीस आल्यावर तेथे संगणकाचा वापर सुरू झाला. सध्या तीन लाखांपेक्षा जास्त रकमेची टेंडर ही आॅनलाइन करण्यामागे ‘चहापाणी’ संस्कृती संपुष्टात आणणे हाच हेतू आहे. अनेक अनुदाने, शिष्यवृत्त्या थेट बँक खात्यात जमा करण्यामागे त्या देताना हात ओले करण्याची अपेक्षा धरण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल हीच अपेक्षा आहे. विक्रीकर, उत्पादन शुल्क, नोंदणी व मुद्रांक शुल्क, अन्न व औषध प्रशासन अशा बहुतांश कार्यालयांत सरकारी कर्मचारी व जनता यांचा संपर्क कमीतकमी करण्यामागे भ्रष्टाचाराला आळा घालणे हाच हेतू असल्याचे अनेक सनदी अधिकारी मान्य करतात.