शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त

By admin | Updated: July 12, 2017 02:48 IST

प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार, असे राज्य सरकारचे धोरण आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार, असे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षकांची ८२२ पदे रिक्त आहेत, तर आताच नव्याने ५४४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे हाच आकडा तब्बल एक हजार ३६६वर पोहोचला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा दर्जा कसा राखला जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खासगी शैक्षणिक संस्थांच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पुरेसे मनुष्यबळ देण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचे, शिक्षण विभागाची पाने उलटून पाहिल्यास दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा मध्यंतरी घसरला होता. मात्र, शिक्षण विभागाने विविध योजना आखून, ‘चार काकण सरस’ असा शिक्षण विभागाचा कारभार निर्माण करण्यात त्यांना यश आले. शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये सातत्य असणे फार आवश्यक असते. मात्र, संबंधित यंत्रणेला पुरेसे मनुुष्यबळ मिळाले नाही, तर त्यामध्ये सुधारणा अपेक्षित धरणे चुकीचे ठरते.रायगड जिल्हा परिषदेने सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून खासगी शाळांच्या शर्यतीत राहण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढावा, यासाठी जून महिन्याच्या सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेने मोठ्या संख्येने बॅनरबाजीही केली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना फार मोठे यश आल्याचे दिसून येत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तब्बल सात हजार १०८ शिक्षकांची पदे मंजूर आहेत, तर ६९२ पदे रिक्त आणि सहा हजार ४१६ पदे भरलेली आहेत. आंतर जिल्हा बदल्यांमुळे ५४४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु मुळातच शिक्षक कमी असल्याने ५४४ शिक्षकांना अद्यापही शिक्षण विभागाने कार्यमुक्त केलेले नाही. बदली झालेली असतानाही शिक्षकांना वाट पाहवी लागत आहे. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शिक्षणाच्या दर्जाबरोबर टिकून राहायचे असेल, तर रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे हात बळकट करण्याची गरज आहे. राज्य सरकारने या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यावर अंमलबजावणी केल्यास जिल्हा परिषदेला पटसंख्या वाढविण्यासाठी जाहिरातबाजी करण्याची गरज भासणार नाही.एवढा मोठा सावळागोंधळ शिक्षण विभागात असताना, कमी मनुष्यबळाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडून गतिमानतेची आणि दर्जाबाबत आशा बाळगणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध असलेल्या मनुुष्यबळावर अतिरिक्त कामाचा ताण टाकून चांगल्या शिक्षणाची कास कशी धरायची? हाच मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.शिक्षण विभागाला मनुष्यबळाची चणचण भासत आहे. कमी मनुष्य संख्येमध्येही जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा टिकवून ठेवण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पाहिजे. यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक