शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त

By admin | Updated: July 12, 2017 02:48 IST

प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार, असे राज्य सरकारचे धोरण आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार, असे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षकांची ८२२ पदे रिक्त आहेत, तर आताच नव्याने ५४४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे हाच आकडा तब्बल एक हजार ३६६वर पोहोचला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा दर्जा कसा राखला जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खासगी शैक्षणिक संस्थांच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पुरेसे मनुष्यबळ देण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचे, शिक्षण विभागाची पाने उलटून पाहिल्यास दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा मध्यंतरी घसरला होता. मात्र, शिक्षण विभागाने विविध योजना आखून, ‘चार काकण सरस’ असा शिक्षण विभागाचा कारभार निर्माण करण्यात त्यांना यश आले. शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये सातत्य असणे फार आवश्यक असते. मात्र, संबंधित यंत्रणेला पुरेसे मनुुष्यबळ मिळाले नाही, तर त्यामध्ये सुधारणा अपेक्षित धरणे चुकीचे ठरते.रायगड जिल्हा परिषदेने सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून खासगी शाळांच्या शर्यतीत राहण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढावा, यासाठी जून महिन्याच्या सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेने मोठ्या संख्येने बॅनरबाजीही केली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना फार मोठे यश आल्याचे दिसून येत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तब्बल सात हजार १०८ शिक्षकांची पदे मंजूर आहेत, तर ६९२ पदे रिक्त आणि सहा हजार ४१६ पदे भरलेली आहेत. आंतर जिल्हा बदल्यांमुळे ५४४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु मुळातच शिक्षक कमी असल्याने ५४४ शिक्षकांना अद्यापही शिक्षण विभागाने कार्यमुक्त केलेले नाही. बदली झालेली असतानाही शिक्षकांना वाट पाहवी लागत आहे. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शिक्षणाच्या दर्जाबरोबर टिकून राहायचे असेल, तर रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे हात बळकट करण्याची गरज आहे. राज्य सरकारने या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यावर अंमलबजावणी केल्यास जिल्हा परिषदेला पटसंख्या वाढविण्यासाठी जाहिरातबाजी करण्याची गरज भासणार नाही.एवढा मोठा सावळागोंधळ शिक्षण विभागात असताना, कमी मनुष्यबळाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडून गतिमानतेची आणि दर्जाबाबत आशा बाळगणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध असलेल्या मनुुष्यबळावर अतिरिक्त कामाचा ताण टाकून चांगल्या शिक्षणाची कास कशी धरायची? हाच मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.शिक्षण विभागाला मनुष्यबळाची चणचण भासत आहे. कमी मनुष्य संख्येमध्येही जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा टिकवून ठेवण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पाहिजे. यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक