शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शिक्षकांनी परत पाठविले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे; दहावी, बारावीच्या निकालावर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 08:46 IST

शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार दिल्याने अनेक गठ्ठे टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. 

मुंबई : विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. राज्य मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिका राज्यातील २५ हजार शिक्षकांनी परत पाठविल्या आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार दिल्याने अनेक गठ्ठे टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. ज्या विषयाच्या परीक्षा झाल्या, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. आपल्या मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनाही उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार देत परत पाठविले. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे अनेक गठ्ठे हे बोर्डात, टपाल कार्यालयात पडून आहेत. मुंबईतील दीड ते दोन हजार शिक्षक, कोल्हापूरमधील दोन हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठविले असून, अन्य जिल्ह्यांमधूनही शिक्षक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवीत आहेत.अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी आगाऊ सूचना महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव, राज्य मंडळ यांना निवेदनाद्वारे दिली होती. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार देत परत पाठविले आहेत. कायम विनाअनुदानित शाळांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. निकाल उशिरा लागल्यास त्यासाठी सरकारच जबाबदार असेल.- संजय डावरे, अध्यक्ष,  विनाअनुदानित कृती समिती, मुंबई