शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठली कार्यपद्धती निश्चित : समायोजनानंतर होणार भरती

By admin | Updated: June 22, 2014 00:53 IST

स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा संचालित, तसेच खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यावर

कार्यपद्धती निश्चित : समायोजनानंतर होणार भरती

वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा संचालित, तसेच खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यावर घातलेली बंदी राज्य शासनाने उठवली असून, पदभरती व वैयक्तिक मान्यता पदोन्नती देण्याची कार्यपद्धतीही निश्चित केली आहे.

राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती व वैयक्तिक मान्यतेसंदर्भात ६ फेब्रुवारी २0१२ च्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी करण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत आढळून आलेल्या सर्व अतिरिक्त शिक्षिकांचे समायोजन होईपर्यत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस बंदी घालण्यात आली होती. आता राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने, २0 जून २0१४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे, सदर बंदी उठवली आहे.नव्या शासन निर्णयानुसार आयुक्त (शिक्षण) यांनी संगणक प्रणालीच्या आधारावर निश्चित केलेल्या संचमान्यतेनुसार शाळानिहाय रिक्त पदांची निश्चिती केली जाईल. जिल्हा परिषदांमधील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), तसेच शिक्षण निरीक्षक व शिक्षक उपसंचालक कार्यालयांनी अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावनिहाय, शाळानिहाय, विषयनिहाय (इयत्ता ६ ते १२ वी) व माध्यमनिहाय यादी तयार करुन, अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे तालुकास्तरावर समायोजित करायची आहेत. त्यानंतरही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत असल्यास, जिल्हा व विभागस्तरावर समायोजन करण्यास सांगण्यात आले आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्याशिवाय, कोणत्याही रिक्त पदावर नवीन भरती करण्यास मंजुरी दिली जाणार नाही. पायाभूत पदांपेक्षा जास्त पदे भरावयाची असल्यास, शासनाची पूर्वमान्यता घ्यावी लागेल. त्या पूर्वमान्यतेशिवाय सदरहू पदे भरता येणार नाहीत. सर्व समायोजनाची खातरजमा झाल्यावर पायाभूत पदांतर्गत पदे रिक्त राहत असल्यास, ६ फेब्रुवारी २0१२ च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करुन या पदभरतीला मान्यता व वैयक्तिक मान्यता देण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)