शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची शक्ती, सुसंस्काराची ताकद; मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:44 IST

राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देविकासासाठी ५८ कोटींचा निधीसुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. राज्यासह देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. त्यांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची श

क्ती व विचारात समाजाला सुसंस्कारित करण्याचे बळ आहे. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची परंपरा आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या समारोपीय कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ.एस. एन. सुब्बाराव, खा. आनंदराव अडसूळ, आ.डॉ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, आ. मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, प्रकाश महाराज वाघ, पुष्पा बोंडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आपण आलो आहे. या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून ऊर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले. राष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडताना शेवटच्या माणसाचा विचार केला. आनंद हा पैशांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणुकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोझरी विकास आराखड्यास ५८ कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ आभार जनार्दनपंत बोथे यांनी मानले.स्वच्छता अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतूनचराष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्यांना दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तीत करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान हीदेखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज