शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची शक्ती, सुसंस्काराची ताकद; मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:44 IST

राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देविकासासाठी ५८ कोटींचा निधीसुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. राज्यासह देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. त्यांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाची श

क्ती व विचारात समाजाला सुसंस्कारित करण्याचे बळ आहे. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची परंपरा आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या समारोपीय कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ.एस. एन. सुब्बाराव, खा. आनंदराव अडसूळ, आ.डॉ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, आ. मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, प्रकाश महाराज वाघ, पुष्पा बोंडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आपण आलो आहे. या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून ऊर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले. राष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडताना शेवटच्या माणसाचा विचार केला. आनंद हा पैशांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणुकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोझरी विकास आराखड्यास ५८ कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ आभार जनार्दनपंत बोथे यांनी मानले.स्वच्छता अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतूनचराष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्यांना दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तीत करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान हीदेखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज