शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 13:02 IST

सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या.

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले तानाजी सावंत यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे. सावंत यांचा युती सरकारमधील मंत्रीपदाचा कार्यकाळ काहीचा वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटल्याची अजब प्रतिक्रिया सावंत यांनी त्यावेळी दिली होती. या वक्तव्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. तसेच खेकड्यांनी धरण फोडले तर मग गुन्हा कोणावर दाखल करायचा असा संताप अनेकांनी व्यक्त केला होता. या वक्तव्यामुळे सावंत यांच्या प्रतिमेला धक्का लागला होता. या व्यतिरिक्त महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावर विरोधकांनी मोठी टीका केली होती. 

दुसरीकडे सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देखील मिळवून दिली. मात्र रश्मी बागल यांच्यापेक्षा 20 हजार अधिक मते पाटील यांना मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले हे स्पष्ट होते. किंबहुना यामुळे शिवसेनेने सावंत यांना मंत्रीपदापासून दूर केले, की खेकड्यांच्या वक्तव्यामुळे डावलले याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही.