शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 13:02 IST

सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या.

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले तानाजी सावंत यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे. सावंत यांचा युती सरकारमधील मंत्रीपदाचा कार्यकाळ काहीचा वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटल्याची अजब प्रतिक्रिया सावंत यांनी त्यावेळी दिली होती. या वक्तव्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. तसेच खेकड्यांनी धरण फोडले तर मग गुन्हा कोणावर दाखल करायचा असा संताप अनेकांनी व्यक्त केला होता. या वक्तव्यामुळे सावंत यांच्या प्रतिमेला धक्का लागला होता. या व्यतिरिक्त महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावर विरोधकांनी मोठी टीका केली होती. 

दुसरीकडे सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देखील मिळवून दिली. मात्र रश्मी बागल यांच्यापेक्षा 20 हजार अधिक मते पाटील यांना मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले हे स्पष्ट होते. किंबहुना यामुळे शिवसेनेने सावंत यांना मंत्रीपदापासून दूर केले, की खेकड्यांच्या वक्तव्यामुळे डावलले याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही.