शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरती: पेपर घेताय की ‘परीक्षा’? सर्व्हर डाऊनमुळे सर्व पेपरना दाेन तास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 06:58 IST

शासनाकडून दिलगिरी, विद्यार्थी-पालकांमध्ये संताप 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तलाठी भरती जाहीर झाल्यापासून भरती प्रक्रियेतील घोळ संपता संपेनात. आधी वाढीव शुल्क, त्यानंतर दूरची केंद्र, नाशिक येथील केंद्रावर घडलेला कॉपीचा प्रकार हे सगळे घोळ सुरू असतानाच सोमवारी परीक्षा तांत्रिक कारणामुळे दोन तास उशीरा सुरू झाली आणि त्याचा मनःस्ताप परीक्षार्थींना सोसावा लागला. राज्यातील ३० जिल्ह्यात ११५ केंद्रांवर सोमवारी तलाठी भरती परीक्षेचे नियोजन होते. टीसीएस कंपनीकडे परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सकाळी पहिल्या सत्रात ९ ते ११ वाजता ऑनलाईन परीक्षा होणार होती. त्यानुसार परीक्षार्थी वेळेच्या आधी केंद्रावर पोहचले. मात्र टीसीएस कंपनीच्या डेटा सेंंटर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षा वेळेवर सुरू झाली नाही. अखेर प्रशासनाकडून परीक्षा दोन तास उशीरा सुरू होईल असा निरोप देण्यात आला. त्यानुसार ९ ची परीक्षा ११ वाजता सुरू झाली. पुढील दोन सत्रातील परीक्षाही दोन तास उशीरा सुरू झाली.

शासनाकडून दिलगिरी

तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनःस्तापाबद्दल शासनाच्या वतीने तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच परीक्षार्थींनी सहकार्य करावे अशी विनंतीही केली आहे.

विद्यार्थी-पालकांमध्ये संताप 

  • नागपूर : प्रत्येक सत्रात दोन तास उशीर. तिसऱ्या सत्राचा ४ चा पेपर ६:३० ला सुरू झाला. संपायला रात्री ९ वाजले.   
  • लातूर : उमेदवारांना केंद्रावर ७:३० ला बोलावले. सर्व्हरमुळे प्रवेश नाकारल्याने उमेदवारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न केला. 
  • धुळे : विलंबामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रावर संताप व्यक्त केला.   
  • अकोला : उशीरा पेपर सुरू झाल्याने अनेकांमध्ये संभ्रम. 
  • छत्रपती संभाजीनगर : शहरात मुक्कामी आलेल्या विद्यार्थी पालकांनी रोष व्यक्त केला.
  • पुणे : ११६ केंद्रांवरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना फटका बसला.
  • गोंदिया : शेवटच्या सत्रातील पेपर सायंकाळी ५:५५ वाजता सुरू झाला व ७:५५ वाजता संपला. 
  • अमरावती : आठही केंद्रावर तांत्रिक बिघाड आल्याने गोंधळ उडाला.

परीक्षा चालू होण्याआधी टीसीएस कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. एक हजार रुपये शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो. ही दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा, समन्वय समिती, महाराष्ट्र

तलाठी परीक्षा प्रक्रिया सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांशी खेळ चालवला आहे. कारणे सांगून सरकार व परीक्षा घेणारे कंत्राटदार जबाबदारी झटकू शकत नाहीत. शुल्कातून १०० कोटींहून अधिकची रक्कम गोळा केली आहे, तरी परीक्षा सुरळीत का होत नाही? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :examपरीक्षा