शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तलाठी भरती: पेपर घेताय की ‘परीक्षा’? सर्व्हर डाऊनमुळे सर्व पेपरना दाेन तास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 06:58 IST

शासनाकडून दिलगिरी, विद्यार्थी-पालकांमध्ये संताप 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तलाठी भरती जाहीर झाल्यापासून भरती प्रक्रियेतील घोळ संपता संपेनात. आधी वाढीव शुल्क, त्यानंतर दूरची केंद्र, नाशिक येथील केंद्रावर घडलेला कॉपीचा प्रकार हे सगळे घोळ सुरू असतानाच सोमवारी परीक्षा तांत्रिक कारणामुळे दोन तास उशीरा सुरू झाली आणि त्याचा मनःस्ताप परीक्षार्थींना सोसावा लागला. राज्यातील ३० जिल्ह्यात ११५ केंद्रांवर सोमवारी तलाठी भरती परीक्षेचे नियोजन होते. टीसीएस कंपनीकडे परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सकाळी पहिल्या सत्रात ९ ते ११ वाजता ऑनलाईन परीक्षा होणार होती. त्यानुसार परीक्षार्थी वेळेच्या आधी केंद्रावर पोहचले. मात्र टीसीएस कंपनीच्या डेटा सेंंटर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षा वेळेवर सुरू झाली नाही. अखेर प्रशासनाकडून परीक्षा दोन तास उशीरा सुरू होईल असा निरोप देण्यात आला. त्यानुसार ९ ची परीक्षा ११ वाजता सुरू झाली. पुढील दोन सत्रातील परीक्षाही दोन तास उशीरा सुरू झाली.

शासनाकडून दिलगिरी

तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनःस्तापाबद्दल शासनाच्या वतीने तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच परीक्षार्थींनी सहकार्य करावे अशी विनंतीही केली आहे.

विद्यार्थी-पालकांमध्ये संताप 

  • नागपूर : प्रत्येक सत्रात दोन तास उशीर. तिसऱ्या सत्राचा ४ चा पेपर ६:३० ला सुरू झाला. संपायला रात्री ९ वाजले.   
  • लातूर : उमेदवारांना केंद्रावर ७:३० ला बोलावले. सर्व्हरमुळे प्रवेश नाकारल्याने उमेदवारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न केला. 
  • धुळे : विलंबामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रावर संताप व्यक्त केला.   
  • अकोला : उशीरा पेपर सुरू झाल्याने अनेकांमध्ये संभ्रम. 
  • छत्रपती संभाजीनगर : शहरात मुक्कामी आलेल्या विद्यार्थी पालकांनी रोष व्यक्त केला.
  • पुणे : ११६ केंद्रांवरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना फटका बसला.
  • गोंदिया : शेवटच्या सत्रातील पेपर सायंकाळी ५:५५ वाजता सुरू झाला व ७:५५ वाजता संपला. 
  • अमरावती : आठही केंद्रावर तांत्रिक बिघाड आल्याने गोंधळ उडाला.

परीक्षा चालू होण्याआधी टीसीएस कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. एक हजार रुपये शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो. ही दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा, समन्वय समिती, महाराष्ट्र

तलाठी परीक्षा प्रक्रिया सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांशी खेळ चालवला आहे. कारणे सांगून सरकार व परीक्षा घेणारे कंत्राटदार जबाबदारी झटकू शकत नाहीत. शुल्कातून १०० कोटींहून अधिकची रक्कम गोळा केली आहे, तरी परीक्षा सुरळीत का होत नाही? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :examपरीक्षा