शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

‘टेकआॅफ’ की नव्या समस्यांचे ‘लँडिंग’?

By admin | Updated: October 17, 2016 01:19 IST

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ही विकासाची मोठी संधीच चालून आलेली आहे.

बी. एम. काळे,

जेजुरी- पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ही विकासाची मोठी संधीच चालून आलेली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्याचे जागतिक महत्त्व अधोरेखित होणार आहे. मात्र, विमानतळ होणार, याच घोषणेने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे या पुढील काळात विमानतळ विषयामध्ये एक सुस्पष्ट पारदर्शकता आणि नियोजनबद्ध प्रस्ताव आखणी गरजेचा आहे. विमानतळाचे टेकआॅफ होताना नव्या समस्यांचे ह्यलँडिगह्ण होणार नाही, याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने विमानतळसंदर्भातील वस्तुस्थिती येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसामोर मांडणे गरजेचे बनले आहे. विमानतळासाठी नेमकी किती जमीन लागणार आहे. तिचे भूसंपादन नेमके कसे केले जाणार आहे. यातून ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, त्यांना नेमका किती व कोणता फायदा होणार आहे, हे याच विभागाने सक्षम अधिकारीमार्फत मांडणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ राजकारण आणि गैरसमाजातून आलेली संधी हुकण्याची आणि विमानतळाला विरोध वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच सात गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा ही या विरोधाची नांदी म्हणावी लागेल. इंचभरही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. >ढवळले राजकीय वातावरण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे विमानतळ मीच आणल्याच्या अविर्भावात येथील शेतकऱ्यांना तारांकित हॉटेल्सची स्वप्ने दाखवत आहेत. अशातच जमिनी खरेदी-विक्री दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. जमीनमालकांची भाषाही बदलली आहे.>जागेचा निर्णय अधांतरीपुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातून आता पुरंदर तालुक्यात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली. तालुक्यात हे विमानतळ कोठे होणार आहे, हे मात्र अजूनही अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने तालुक्यातील तीन ठिकाणचा सर्वे केला आहे. यात पारगाव परिसर, राजेवाडी, आंबळे परिसर आणि रिसेपिसे, राजुरी परिसर येथील पाहणी केली होती. जेजुरी परिसराची पाहणी केल्याची चर्चा होती. यापैकी सोयीची जागा विमान वाहतूक विभागाकडून नक्की होणार आहे. ती अजून नक्की झालेली नाही. याबाबत तालुका महसूल विभागाकडेही कोणतीच अधिकृत माहिती नाही. >धास्ती कायम राजेवाडी : पुरंदर तालुक्यातील सात गावात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आंतरराष्टीय विमानतळ उभारला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे, असे राजेवाडीचे माजी सरपंच रामदास जगताप व आदर्श शेतकरी विलास कडलग यांनी सांगितले. राजेवाडी, आंबळे, वाघापुर, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपुर या सात गावातील सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सातही गावातील शेतकरी महिलांनी विरोध केला होता त्या वेळी शिवतारे यांनी तुमचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही असे सांगितले होते तरी सुध्दा विमानतळाबाबत ते आग्रही का असा सवालही जगताप यांनी केला. आमची घरे जाळून तालुक्याचा विकास करु नका आम्हाला फक्त पुरंदर उपसाचे नियमित पाणी द्या आमच्या गावांचा विरोध कायम राहणार असल्याचे विलास कडलग यांनी सांगितले.>जिवापाड जपलेल्या जमिनींचे काय?पुणे जिल्ह्यात पुरंदरने कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके अनुभवले आणि सोसले आहेत. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यात विमानतळ होणे हे खरोखरंच पुरंदरचे भाग्य समजावे लागेल. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही जिवापाड जपलेल्या जमिनी देऊन येथील शेतकऱ्यांचे भविष्य काय? हा प्रश्न मात्र पुरंदरकरांसमोर आहे. पुरंदर जागतिक दळणवळणाचे एक केंद्र बनणार असले, तरी ज्यांच्यामुळे हे होणार आहे, त्यांचा विचार सर्वप्रथम होणार का? हा प्रश्न अद्याप तरी अधांतरी आहे.