शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

रजेचा आढावा घ्या -आयुक्त

By admin | Updated: May 5, 2015 01:41 IST

वाकोला पोलीस ठाण्यातील हत्या व आत्महत्येच्या घटनेनंतर मुंबई पोलीस दल खडबडून जागे झाले असून, साहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी

डिप्पी वांकाणी, मुंबई वाकोला पोलीस ठाण्यातील हत्या व आत्महत्येच्या घटनेनंतर मुंबई पोलीस दल खडबडून जागे झाले असून, साहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व पोलीस उपायुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व रजेच्या अर्जांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तणावपूर्ण असेल तरच रजेचे अर्ज रद्द करावेत, अशा सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सर्व पोलीस उपायुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात किती अर्ज प्रलंबित आहेत, याची माहिती तत्काळ देण्याबाबतचे आदेशही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे भारती यांनी सांगितले. मुंबईतील एका पोलीस उपायुक्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात १०० पोलीस असतील, तर त्यातील २० टक्के लोक रजेवर वा आठवड्याच्या सुटीवर असतात. उर्वरित अधिकारी वा कर्मचाऱ्यांतील ५० टक्के नाकाबंदी व कायदा आणि सुरक्षासंदर्भात नियुक्त केलेले असतात. राहिलेले पोलीस चौकीवर तैनात असतात. उन्हाळा व दिवाळीच्या काळात रजेचे अर्ज वाढतात़ कारण या काळात मुलांना शाळेला सुट्या असतात. वाकोला प्रकरणानंतर सर्व रजेचे अर्ज मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण काही वेळा कोणाचा अर्ज मंजूर करावा व कोणाचा नाकारावा, असा प्रश्न निर्माण होतो़ रजेसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून, कुटुंबातील कोणी आजारी असेल तर तात्काळ रजा दिली जाते, पण उन्हाळी वा इतर कारणांसाठी सुटी हवी असेल तर त्याला नंतर रजा दिली जाते. साहाय्यक पोलीस निरीक्षक शिर्केने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला रजेचा अर्ज नामंजूर झाल्यामुळे नव्हता. कारण यावर्षी त्याला ३८ रजा देण्यात आल्या होत्या. तरीही पोलीस दलात रजेमुळे असंतोष राहू नये, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वाटते.