शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या, शिवसेना स्वबळावर विजयी होईल - उद्धवनी सुनावले

By admin | Updated: November 9, 2015 11:13 IST

बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली असून महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल, भविष्यकाळ आमचाच आहे, असे उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बिहार निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावे लागलेल्या भारतीय जनता पक्षावर मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडत दिल्ली विधानसभेचे निकाल ज्यांनी ‘सहज’तेने घेतले मात्र बिहारचे निकाल गांभीर्याने घ्यावे लागतील, असे सुनावले आहे. तसेच ' बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली असून महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल' असा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.  ' आमचे पाय जमिनीवर आहेत, ज्यांचे नव्हते ते आपटले' अशा कानपिचक्याही 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आल्या आहेत.
 
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला मोठा पराभव स्वीकारावा लागला असून नितिश कुमार, लालूप्रसाद यादव व काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्या पार्श्वभूमीवर शिवेसेनेने भाजपाला चांगलेच सुनावले आहे. 'संपूर्ण साधनसंपत्ती पणाला लावूनही भाजपचा पराभव झाला, उलट नीतिशकुमारांनी उपलब्ध साधनसंपत्तीच्या बळावर बिहारमध्ये बहार आणली', अशा शब्दांत उद्धव यांनी नीतिशकुमारांची स्तुती केली आहे. तसेच सत्ता व पैशांचा वारेमाप वापर करून एकदा जिंकता येते, एखाद्याला एकदाच मूर्ख बनवता येते, वारंवार नाही, असेही उद्धव यांनी भाजपा व मोदींना सुनावले.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे -
- बिहारचे निकाल ‘भाजप’च्या बाजूने लागतील असे सांगणारे ‘सर्व चाणक्य’ तोंडावर आपटले आहेत. बिहारात ‘कांटे की टक्कर’ होईल व विधानसभा त्रिशंकू राहील असे सांगणारे ‘सर्व्हे’ खोटे ठरले आहेत. बिहारातील निवडणुकीचे निकाल एकतर्फी लागले व सत्ता-संपत्तीचे ‘वतनदार’ नितीशकुमारांच्या रणनीतीसमोर पाचोळ्यासारखे उडून गेले. नितीशकुमार यांच्या विजयाने देशातील राजकीय समीकरणे बदलतील काय? या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल. कारण बिहारची भूमी ही राष्ट्रीय राजकारणाची भूमी आहे. बिहारच्या रक्तात व मातीत राजकारण आहे. दिल्ली विधानसभेचे निकाल ज्यांनी ‘सहज’तेने घेतले त्यांना बिहारचे निकाल गांभीर्याने घ्यावे लागतील. कारण बिहारच्या मैदानात नितीशकुमार विरुद्ध नरेंद्र मोदी असा जंगी सामना होता.
-  बिहारची निवडणूक रणधुमाळी ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आठवण करून देणारी होती. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांसह संपूर्ण केंद्रीय सत्ता महाराष्ट्रात उतरली. राज्या-राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, देशभरातले खासदार-आमदार-धनदांडगे येथे तळ ठोकून बसले, पण ती कोंडी फोडून शिवसेनेने ६३ जागांपर्यंत स्वबळावर उसळी मारलीच. बिहारातही त्याच सत्ता-संपत्ती आणि घोषणांचा वापर झाला. दीड लाख कोटी पॅकेजची बोली पंतप्रधानांनी लावली. मात्र तरीही नीतिशकुमारांचा विजय का झाला? याचे पहिले कारण म्हणजे नितीशकुमार यांनी थापा मारल्या नाहीत व बिहारच्या जनतेला विश्‍वासात घेऊन ते काम करीत राहिले. त्यांनी खोटी स्वप्ने दाखवली नाहीत. सत्ता व पैशांचा वारेमाप वापर करून एकदा जिंकता येते. जसे एखाद्याला एकदाच मूर्ख बनवता येते, वारंवार नाही
- लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतर फक्त दीड वर्षात झालेली ही पडझड आहे. या पडझडीची जबाबदारी आता कोण घेणार? भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे शेवटी त्यांनाच शोधायची आहेत. भारतीय जनता पक्षाचे काय चुकले यावर आम्ही पामर काय भाष्य करणार? मोदी यांनी पंतप्रधान म्हणून बिहारात ३०च्या वर प्रचंड सभा घेतल्या. त्या सभांचे फलित म्हणायचे तर ५५ जागासुद्धा नाहीत. शिवसेना बिहारात एका जिद्दीने लढली. राष्ट्रवादी काँग्रेस, ‘ओवेसी’च्या एमआयएमपेक्षा शिवसेनेचे मताधिक्य जास्त आहे हा एक प्रकारे विजयच आहे. शिवसेना महाराष्ट्राबाहेर पसरते आहे. भविष्यकाळ शिवसेनेचाच आहे. बिहार निकालाचा संदेश इतकाच की, महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या. शिवसेना विजयाची गरुडझेप स्वबळावर घेईल. ही लोकभावना उद्याचा जनादेश आहे.