शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
4
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
5
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
6
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
7
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
8
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
9
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
10
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
11
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
12
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
13
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
14
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
15
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
16
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
17
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
18
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
19
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
20
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात न्या, बक्षीस मिळवा, केंद्र शासनाची योजना : १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 12:46 IST

Central Government News: अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. वेळेत उपचार न झाल्यामुळे जखमींचे मृत्यू वाढतात.  

- राम शिनगारेऔरंगाबाद : अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. वेळेत उपचार न झाल्यामुळे जखमींचे मृत्यू वाढतात.  हे टाळण्यासाठी अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे येऊन तासाभरात त्यांना रुग्णालयात पोहोचवावे. ही नि:स्वार्थ मदत केल्याबद्दल संबंधिताला पाच हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून,  त्याची अंमलबजावणी १५ ऑक्टोबरपासून होणार असल्याची अधिसूचना केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने काढली आहे. बिहारमध्ये २०१८ पासून अपघातात जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपये बक्षीस देण्याची योजना राबविण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर ही योजना देशभर लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. जखमींना तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असल्याचा निष्कर्ष पाहणीतून दिसला.  अपघातानंतर तासाभरात जखमीला रुग्णालयात पोहोचून त्याच्यावर उपचार सुरू झाल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता बळावते.  जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी  स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्यांची संख्या वाढावी, रुग्णाचे प्राण वाचावे म्हणून ५ ते १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.  

प्रधान सचिवांना पाठविले पत्रभारतीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून ही योजना १५ ऑक्टोबरपासून देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी ३१ मार्च २०२६ पर्यंत     असणार आहे. 

तासाभरात मदत  मिळाल्यास जीव वाचतीलशरीरात पाच लिटर रक्त असते. अपघातात रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो. रक्तस्राव अधिक झाल्यामुळे बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे जेवढे लवकर अपघातग्रस्तावर उपचार सुरू होतील, तेवढा त्या रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. डोक्याला मार लागलेला असेल, तर त्यावर वेळीच उपचार सुरू झाले पाहिजेत. तासाभराच्या आत मदत मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल. चौकशीचा ससेमिरा लागेल म्हणून अनेकजण मदतीला पुढे येत नाहीत. मदत करणाऱ्यांना पाच हजार रुपये देण्याची योजना स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे (घाटी) अधीक्षक डॉ. काशीनाथ चौधरी यांनी व्यक्त केली. 

केंद्र शासनाची अधिसूचना निघाली असल्याचे समजले. त्यानुसार राज्य शासनाने काही निर्देश दिल्यास त्याची कडकपणे अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करेल.- शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :AccidentअपघातCentral Governmentकेंद्र सरकार