शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

स्थलांतरित मजूर,बेघर, शोषितांची अन्न,औषधांसह सर्व काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:09 IST

हायकोर्ट: जिल्हा विधी सेवा समित्यांनी समन्वय करावा

विशेष प्रतिनिधीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात स्थलांतरित मजूर, शहरांमधील बेघर व समाजातील तळागळाचे वर्ग यापैकी कोणीही उपाशी राहणार नाही याची राज्य सरकारने व्यवस्था करावी आणि त्यांना अन्नाखेरीज पिण्याचे पाणी, औषधे, आरोग्यसेवा व स्वच्छतागृहांची सोय करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.सर्व हारा जन आंदोलन, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती व घर बचाओ घर बनाओ आंदोलन या संघटनांनी केलेल्या जनहित याचिकांवर न्या. अमजद सैयद यांनी व्हिडिओ सुनावणी घेऊन हा अंतरिम आदेश दिला. पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवून त्यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरलनी यावे,असेही निर्देश न्यायालयाने दिले.न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांनी ज्या समाजवर्गांचे गाºहाणे याचिकांतून मांडले आहे त्यांची काळजी घेतली जात आहे, असे सरकार म्हणते. पण अनेक ठिकाणी या लोकांपर्यंत सरकारची मदत व लाभ पोहोचत नाहीत, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. आपत्तीने विस्थापित झालेल्या लोकांच्या मदत आणि पुनर्वन कामात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांनी समन्वयाचे काम करून सरकारी मदत गरजूंपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याची तरतूद कायद्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी हे समन्वयाचे काम करावे.या लोकांसााठी सरकारकडून केल्या जात असलेल्या कामात कुठे त्रुटी वा उणिवा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी त्यासंबंधीचे निवेदन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलने पाठवावे व त्याची प्रत ई-मेलनेच संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडेही पाठवावी. असे निवेदन मिळाल्यावर जिल्हा प्राधिकरणाने सक्षम अधिकाºयावर हे काम सोपवून संबंधित सरकारी अधिधकाऱ्यांकडे त्याविषयी पाठपुरावा करावा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांनी अशा प्रकारे केलेल्या कामाचा अहवालही न्यायालयास पाठवायचा आहे.या सुनावणीत याचिकाकर्त्यांसाठी ज्येष्ठ वकील गायत्री सिंग व अ‍ॅड.एल. सी. कक्रांती व रोनिटा भट्टाचार्य यांनी तर सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील बी. व्ही. सामंत यांनी काम पाहिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय