शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

महाराष्ट्रातच दारुबंदी करा

By admin | Updated: January 21, 2015 00:32 IST

महाराष्ट्रात वर्षाला दारूवर सरासरी ४० हजार कोटी रुपये खर्च होतो, रस्ते अपघात, आरोग्यासह महिला अत्याचाराच्या घटनांसाठी दारू कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामळे सरकारने

डॉ. अभय बंगनागपूर : महाराष्ट्रात वर्षाला दारूवर सरासरी ४० हजार कोटी रुपये खर्च होतो, रस्ते अपघात, आरोग्यासह महिला अत्याचाराच्या घटनांसाठी दारू कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामळे सरकारने संपूर्ण राज्यात दारुबंदी करावी आणि दारुबंदी ते दारुमुक्ती या दिशेने प्रवास करावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक आणि दारुबंदीसाठी आंदोलन करणारे डॉ. अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.चंद्रपूर येथे दारुबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे आणि आंदोलन करणाऱ्या महिलांचे अभिनंदन केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या जुन्या अहवालाचे दाखले देत बंग यांनी दारूमुळे होणारे आर्थिक, सामाजिक तसेच आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचे मुद्देसूद विवेचन केले. २०१२ मध्ये देशात ३३ लाख लोकांचा मृत्यू दारूमुळे झाला होता. १५ ते ५० वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूसाठी दारू हेच प्रमुख कारण ठरले होते आणि १३ कोटी मानवी वर्षे वाया गेली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दारूमुळे २०० आजार होतात, असेही आढळून आले आहे. ही चिंतेची बाब आहे, असे बंग म्हणाले.राज्यात दारूवर होणारा खर्च ४० हजार कोटींचा असून महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ५०० कोटींची दारू विक्री होत होती. कुटुंबनिहाय हा खर्च लक्षात घेतला तर हा खर्च १० ते १२ हजार रुपयांचा होतो. याचे आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामाने विक्राळ रूप धारण केले होते. त्यामुळेच महिला रस्त्यावर उतरल्या आणि सरकारला चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करावी लागली. हे महिलांच्या आंदोलनाचे यश आहे. जनरेट्यामळे वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली असली तरी दारूमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी लागू करावी असे डॉ. बंग म्हणाले.दारूपासून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे जनकल्याण योजनांसाठी निधीचा स्रोत म्हणून बघणे चुकीचे आहे. गुजरातमध्ये दारुबंदी आहे आणि हे राज्य विकसित आहे. दारुबंदी करून गुजरातचा विकास होऊ शकत असेल तर महाराष्ट्राचा विकास का होणार नाही, असा सवाल बंग यांनी केला.अंमलबजावणीसाठी दारुमुक्ती झोन कराआर्थिक-सामाजिक विकासाचा कार्यक्रम म्हणून दारुबंदीची अंमलबजावणी केल्यास ती अधिक प्रभावी ठरेल. दारुबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा दारुमुक्त झोन तयार करावा, यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा निर्माण करावी, जिल्ह्यातील ठाणेदारांकडून त्यांच्या भागातील दारुबंदीची स्थिती जाणून घेताना महिलांचे मत घ्यावे. ही यंत्रणा तयार करण्यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित असून हा निधी उभारण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील उद्योगावर सेस लावावा, अशी अशी सूचनाही डॉ. अभय बंग यांनी केली.