शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लातूरातील अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कार्यवाही करा, नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 20:41 IST

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश ...

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश आहे. असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनात गोऱ्हे म्हणाल्या की, या टोळीनं दिनांक एक जुलै २०१७ ला लातूरमधून अकरा वर्षांची मुलीला गोड बोलून हातोहात पळवलं. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. या मुलीला या टोळीने सांगली जिल्ह्यातील तासगावातल्या सावर्डे गावातल्या 34 वर्षीय उमेश जगन्नाथ माने या इसमाला विकले होते. पण 25 दिवस मुलीचा पत्ता लागला नाही. मात्र, संधी मिळताच या मुलीने आपल्या कुटुंबियांना फोन केल्यावर पोलिसांनी त्वरीत कार्यवाही करून ही टोळी ताब्यात घेतली हे एक पोलिसांनी उचललेले योग्य पाऊल आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता राज्यातल्या 14 जिल्ह्यात या टोळ्या कार्यरत असून गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात 300 महिला, मुलींच्या मिसिंग केस दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार केवळ ६० मुली हरवल्या होत्या आणि त्यांचा शोध घेण्यात आला असून त्या सापडल्या आहेत. या मुलींचे शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरु असताना त्यात अचानक घडणाऱ्या अशा घटनांमुळे खंड पडतो आहे.  याबाबत गावनिहाय माहिती घेऊन कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा दलालांवर  योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.  पालकांच्या म्हणण्यानुसार या प्रकारच्या घटनेची तक्रार घ्यायला पोलीस टाळाटाळ करतात. परंतु, पालकच अशा गोष्टींची तक्रार देत नाहीत असा पोलिसांचा दावा आहे. हैद्राबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरातील कुंटणखान्यातही लातूर मराठवाडा परिसरातील मुली असल्याची माहिती काही स्वयंसेवी संस्थाकडून मिळाली आहे. अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवरदेखील प्रतिबंध घालणे अत्यावश्यक आहे.महिला आणि मुलींची अवैधरीत्या वाहतुकीच्या या प्रश्नावर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या हेतूने बैठका आणि सुसंवाद होण्याची गरज या निमित्ताने वाटते. सन २०१५ मध्ये मी मराठवाडा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी या प्रकारच्या गुन्ह्याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रत्यक्ष भेटून सूचना केली होती. त्याचबरोबर उदगीर भागात दोन वर्षांपूर्वी एका महिलेचे अशा प्रकारे फसवणूक केल्याबाबत आंदोलनातही मी सहभागी झाले होते. महिला व मुलीना फसवून वाममार्गाला लावण्याऱ्या या टोळ्या लातूरसह अन्य भागातही कार्यरत असून लातूरचा भाग सीमावर्ती असल्याने अशा प्रकारचे गुन्हे करुन पळून जाण्यात त्या यशस्वी होत आहेत.मुख्यमंत्र्यांची त्वरीत दखल व सकारात्मक प्रतिसाद :ज्या परिवारातून मुलगी हरवली असेल त्या कुटुंबीयांकडून तक्रारी येत नाहीत, अशावेळी पोलिसांनी विशेष मोहीम वा कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा शाळा सोडलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे गरजेचे आहे या आ. डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेवर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे