शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

लातूरातील अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कार्यवाही करा, नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 20:41 IST

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश ...

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश आहे. असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनात गोऱ्हे म्हणाल्या की, या टोळीनं दिनांक एक जुलै २०१७ ला लातूरमधून अकरा वर्षांची मुलीला गोड बोलून हातोहात पळवलं. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. या मुलीला या टोळीने सांगली जिल्ह्यातील तासगावातल्या सावर्डे गावातल्या 34 वर्षीय उमेश जगन्नाथ माने या इसमाला विकले होते. पण 25 दिवस मुलीचा पत्ता लागला नाही. मात्र, संधी मिळताच या मुलीने आपल्या कुटुंबियांना फोन केल्यावर पोलिसांनी त्वरीत कार्यवाही करून ही टोळी ताब्यात घेतली हे एक पोलिसांनी उचललेले योग्य पाऊल आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता राज्यातल्या 14 जिल्ह्यात या टोळ्या कार्यरत असून गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात 300 महिला, मुलींच्या मिसिंग केस दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार केवळ ६० मुली हरवल्या होत्या आणि त्यांचा शोध घेण्यात आला असून त्या सापडल्या आहेत. या मुलींचे शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरु असताना त्यात अचानक घडणाऱ्या अशा घटनांमुळे खंड पडतो आहे.  याबाबत गावनिहाय माहिती घेऊन कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा दलालांवर  योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.  पालकांच्या म्हणण्यानुसार या प्रकारच्या घटनेची तक्रार घ्यायला पोलीस टाळाटाळ करतात. परंतु, पालकच अशा गोष्टींची तक्रार देत नाहीत असा पोलिसांचा दावा आहे. हैद्राबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरातील कुंटणखान्यातही लातूर मराठवाडा परिसरातील मुली असल्याची माहिती काही स्वयंसेवी संस्थाकडून मिळाली आहे. अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवरदेखील प्रतिबंध घालणे अत्यावश्यक आहे.महिला आणि मुलींची अवैधरीत्या वाहतुकीच्या या प्रश्नावर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या हेतूने बैठका आणि सुसंवाद होण्याची गरज या निमित्ताने वाटते. सन २०१५ मध्ये मी मराठवाडा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी या प्रकारच्या गुन्ह्याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रत्यक्ष भेटून सूचना केली होती. त्याचबरोबर उदगीर भागात दोन वर्षांपूर्वी एका महिलेचे अशा प्रकारे फसवणूक केल्याबाबत आंदोलनातही मी सहभागी झाले होते. महिला व मुलीना फसवून वाममार्गाला लावण्याऱ्या या टोळ्या लातूरसह अन्य भागातही कार्यरत असून लातूरचा भाग सीमावर्ती असल्याने अशा प्रकारचे गुन्हे करुन पळून जाण्यात त्या यशस्वी होत आहेत.मुख्यमंत्र्यांची त्वरीत दखल व सकारात्मक प्रतिसाद :ज्या परिवारातून मुलगी हरवली असेल त्या कुटुंबीयांकडून तक्रारी येत नाहीत, अशावेळी पोलिसांनी विशेष मोहीम वा कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा शाळा सोडलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे गरजेचे आहे या आ. डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेवर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे