शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

लातूरातील अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कार्यवाही करा, नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 20:41 IST

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश ...

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश आहे. असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनात गोऱ्हे म्हणाल्या की, या टोळीनं दिनांक एक जुलै २०१७ ला लातूरमधून अकरा वर्षांची मुलीला गोड बोलून हातोहात पळवलं. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. या मुलीला या टोळीने सांगली जिल्ह्यातील तासगावातल्या सावर्डे गावातल्या 34 वर्षीय उमेश जगन्नाथ माने या इसमाला विकले होते. पण 25 दिवस मुलीचा पत्ता लागला नाही. मात्र, संधी मिळताच या मुलीने आपल्या कुटुंबियांना फोन केल्यावर पोलिसांनी त्वरीत कार्यवाही करून ही टोळी ताब्यात घेतली हे एक पोलिसांनी उचललेले योग्य पाऊल आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता राज्यातल्या 14 जिल्ह्यात या टोळ्या कार्यरत असून गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात 300 महिला, मुलींच्या मिसिंग केस दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार केवळ ६० मुली हरवल्या होत्या आणि त्यांचा शोध घेण्यात आला असून त्या सापडल्या आहेत. या मुलींचे शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरु असताना त्यात अचानक घडणाऱ्या अशा घटनांमुळे खंड पडतो आहे.  याबाबत गावनिहाय माहिती घेऊन कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा दलालांवर  योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.  पालकांच्या म्हणण्यानुसार या प्रकारच्या घटनेची तक्रार घ्यायला पोलीस टाळाटाळ करतात. परंतु, पालकच अशा गोष्टींची तक्रार देत नाहीत असा पोलिसांचा दावा आहे. हैद्राबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरातील कुंटणखान्यातही लातूर मराठवाडा परिसरातील मुली असल्याची माहिती काही स्वयंसेवी संस्थाकडून मिळाली आहे. अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवरदेखील प्रतिबंध घालणे अत्यावश्यक आहे.महिला आणि मुलींची अवैधरीत्या वाहतुकीच्या या प्रश्नावर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या हेतूने बैठका आणि सुसंवाद होण्याची गरज या निमित्ताने वाटते. सन २०१५ मध्ये मी मराठवाडा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी या प्रकारच्या गुन्ह्याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रत्यक्ष भेटून सूचना केली होती. त्याचबरोबर उदगीर भागात दोन वर्षांपूर्वी एका महिलेचे अशा प्रकारे फसवणूक केल्याबाबत आंदोलनातही मी सहभागी झाले होते. महिला व मुलीना फसवून वाममार्गाला लावण्याऱ्या या टोळ्या लातूरसह अन्य भागातही कार्यरत असून लातूरचा भाग सीमावर्ती असल्याने अशा प्रकारचे गुन्हे करुन पळून जाण्यात त्या यशस्वी होत आहेत.मुख्यमंत्र्यांची त्वरीत दखल व सकारात्मक प्रतिसाद :ज्या परिवारातून मुलगी हरवली असेल त्या कुटुंबीयांकडून तक्रारी येत नाहीत, अशावेळी पोलिसांनी विशेष मोहीम वा कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा शाळा सोडलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे गरजेचे आहे या आ. डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेवर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे