शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्याच्या शिलेदारांच्या अथांगतेची गाथा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:50 IST

- राज चिंचणकर अथांग सागराच्या रंगमंचावर शत्रूसैन्य घिरट्या घालत आहे आणि अशातच किल्ल्याच्या भिंती लवकर उभ्या राहाव्यात म्हणून एकावर ...

- राज चिंचणकर

अथांग सागराच्या रंगमंचावर शत्रूसैन्य घिरट्या घालत आहे आणि अशातच किल्ल्याच्या भिंती लवकर उभ्या राहाव्यात म्हणून एकावर एक दगड रचले जात असतानाच, दुसऱ्या हाताने तोफेला बत्तीही दिली जात आहे. हे दगडसुद्धा अशा पद्धतीने रचले जात आहेत, की त्यांच्यामधून समुद्राच्या भरतीचे पाणी अलगद आरपार निघून जाणार आहे.

इतकेच नव्हे; तर बेटावरचे दगड काढून किल्ल्याच्या तटासाठी वापरल्यावर, दगड निघालेल्या खळग्यांमध्ये पावसाचे गोड पाणी आपसूक साठणार आहे...! या नामी संकल्पनेला तब्बल साडेतीनशे वर्षांचा काळ उलटून गेला आहे राजेहो...! काळ सरला, पण ज्याच्या अंगाखांद्यावर हे सगळे घडले, तो 'खांदेरी' किल्ला आजही भरसमुद्रात या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे आणि किल्ल्याच्या तटबंदी श्रीशिवछत्रपती व त्यांच्या कर्तबगार शिलेदारांना कुर्निसात करत आहेत.

कल्याणला दुमदुमला भेरी चौघडा, गर्जे कडकडा, शिंपिला मनोरंजनाचा सडा... उमटली पदचिन्हे दारात, प्रकटली दर्याभवानी साक्षात, उजळला रंगमंच तेजात... अशा सार्थ शब्दांत तत्कालीन ‘खांदेरी’ बेटावरचा हा सगळा थरार रंगभूमीवर आविष्कृत झाला आहे. ‘दर्याभवानी’ असे नामाभिमान या थराराला देत, साडेतीन शतकांपूर्वी ‘खांदेरी’वर घडलेल्या स्वराज्याच्या शिलेदारांच्या अथांगतेची गाथा यात सांगण्यात आली आहे.

या गाथेचा शिल्पकार, ‘खांदेरी’वर भक्कम पाय रोवलेला सुभेदार मायनाक भंडारी असला, तरी त्याच्या नेतृत्वाखाली स्वराज्यातल्या असंख्य हातांनी केलेली पराक्रमाची शर्थ या नाट्याद्वारे इतिहासाला थेट वर्तमानात आणून ठेवते. हा सगळा पट लेखक व गीतकार संदीप विचारे; तसेच रंगावृत्तीकार व दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्या सक्षम हातांकरवी रंगमंचावर दृगोच्चर झाला आहे.

मुंबईहून अलिबागला समुद्रमार्गे प्रवास करताना, ‘खांदेरी’ हा जलदुर्ग लक्ष वेधून घेतो. श्रीशिवछत्रपतींच्या मावळ्यांनी हे बेट इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले. हा पराक्रम गाजवताना, इंग्रज विरुद्ध मराठे असे सागरी युद्ध झडले. ही शौर्यगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ‘दर्याभवानी’चा घाट घालण्यात आल्याचे या नाट्यातून स्पष्ट होत जाते. तब्बल चाळीस कलाकारांच्या संचात घडणाºया या आविष्कारात नाट्य व नृत्य यांचा मिलाफ साधण्यात आला आहे.

महाराष्ट्रातले किल्ले म्हटले की रायगड, राजगड, शिवनेरी अशी नावे सर्वसाधारणपणे ओठांवर येतात; मात्र संदीप विचारे यांनी या महानाट्याचे लेखन करताना, ‘खांदेरी’ किल्ला निवडला आणि त्यांची ही निवड सार्थ असण्यावर हे नाट्य मोहोर उमटवते. या नाट्याच्या निमित्ताने ‘खांदेरी’चे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. या कथेचा गाभा मर्यादित असला, तरी त्याला असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला सलाम करत त्यांनी हे संहितालेखन केल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने लेखक व रंगावृत्तीकार यांच्या परिश्रमांना दाद द्यावी लागेल.

एवढा सगळा थाट रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात उभा करायचा हे सोपे काम नाही. दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी संहितेला प्रमाण मानत हे नाट्य उभे केल्याने, ऐतिहासिक कथानकात दिसणारा चाकोरीबद्ध बडेजाव टाळला गेला आहे. ‘खांदेरी’चे महत्त्व आणि मराठा आरमाराची कर्तबगारी पटवून देण्याकडे त्यांनी लक्ष पुरवल्याने, या नाट्यामागचा मूळ हेतू साध्य झाला आहे. हे समूहनाट्य असल्याने, कुणा एकावर या नाटकाची सारी भिस्त येऊन पडलेली नाही.

तरीही, युद्धजन्य काळात अथक परिश्रमाने ज्याच्या नेतृत्वाखाली ‘खांदेरी’ची तटबंदी उभी राहिली, तो सुभेदार मायनाक भंडारी याच्याकडे या कथेचे नायकत्व जाते. ही भूमिका रोहित मावळे याने त्याच्यातल्या नेतृत्वगुणांचे दर्शन घडवत टेचात उभी केली आहे. जयंत पानसे, प्रसाद वैद्य, सचिन लिमये, विकास पवार, अमेय दळवी, नीलेश पाटील, धर्मश्री धारपवार, अनुप सिंग, सूरज परब या आणि अशा अनेक हरहुन्नरी कलाकारांनी ही ‘दर्याभवानी’ सजीव केली आहे.

नाटकातल्या पात्रांची वेशभूषा व रंगभूषा यावर घेतलेले कष्ट सार्थकी लागले आहेत. नृत्यदिग्दर्शक सचिन गजमल यांच्या नृत्यरचना नाटकात फिट्ट बसल्या आहेत. मनोहर गोलांबरे यांच्या संगीताने हे नाट्य रंजक केले आहे. बेट, किल्ला, जहाज आणि समुद्राचा आभास निर्माण करण्याचे काम प्रसाद वालावलकर यांच्या नेपथ्याने व्यवस्थित केले आहे. समुद्र्रातल्या दीपस्तंभासह विविध प्रकाशझोत, शीतल तळपदे यांनी त्यांच्या प्रकाशयोजनेतून नीट पोहोचवले आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र