शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:33 IST

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई: दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण असून  बाजारात त्याचप्रमाणे  गणेशोत्सव मंडळांत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची दाहकता कमी झाली असली तरी काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात २,३३७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तसेच ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीत गर्दीमुळे  स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी या काळात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरानागरिकांनी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. मात्र, त्याचवेळी स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाचेही भान ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी शक्यतो मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूसारख्या आजाराचा प्रादुर्भाव शक्यतो वाढणार नाही. परंतु आपण कोणतेच भान बाळगले नाही, तर त्याचा भविष्यात नक्कीच त्रास होऊ शकतो. - डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कोरोना कृती दल. 

 कोरोना नियमांचे पालन गरजेचेकोरोनाचा कराल काळ आपण पाहिला, अनुभवला. त्यातून आपण काही शिकलो की नाही, हा प्रश्न आहे. मूलभूत गोष्टी आपण विसरतो. इकडे तिकडे थुंकणे, शिंकताना नाकावर रुमाल न ठेवणे या सगळ्या गोष्टी थांबायला हव्या. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून जायला हवे, हे आता लोकांनी कधीच विसरता काम नये. विशेषत: सहव्याधी असलेल्यांनी तर हे नियम काटेकोरपणे पाळायलाच हवे. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहायचे असेल तर कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम पाळत होतो, ते पाळणे गरजेचे आहे.  - डॉ. समीर गर्दे, श्वसनविकार तज्ज्ञ 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यMumbaiमुंबई