शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:33 IST

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई: दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण असून  बाजारात त्याचप्रमाणे  गणेशोत्सव मंडळांत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची दाहकता कमी झाली असली तरी काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात २,३३७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तसेच ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीत गर्दीमुळे  स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी या काळात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरानागरिकांनी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. मात्र, त्याचवेळी स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाचेही भान ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी शक्यतो मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूसारख्या आजाराचा प्रादुर्भाव शक्यतो वाढणार नाही. परंतु आपण कोणतेच भान बाळगले नाही, तर त्याचा भविष्यात नक्कीच त्रास होऊ शकतो. - डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कोरोना कृती दल. 

 कोरोना नियमांचे पालन गरजेचेकोरोनाचा कराल काळ आपण पाहिला, अनुभवला. त्यातून आपण काही शिकलो की नाही, हा प्रश्न आहे. मूलभूत गोष्टी आपण विसरतो. इकडे तिकडे थुंकणे, शिंकताना नाकावर रुमाल न ठेवणे या सगळ्या गोष्टी थांबायला हव्या. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून जायला हवे, हे आता लोकांनी कधीच विसरता काम नये. विशेषत: सहव्याधी असलेल्यांनी तर हे नियम काटेकोरपणे पाळायलाच हवे. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहायचे असेल तर कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम पाळत होतो, ते पाळणे गरजेचे आहे.  - डॉ. समीर गर्दे, श्वसनविकार तज्ज्ञ 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यMumbaiमुंबई