शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

‘स्वयंम शिक्षण प्रयोग’चा संयुक्त राष्ट्रांकडून गौरव

By admin | Updated: October 3, 2016 05:19 IST

‘स्वयंम शिक्षण प्रयोग’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने पर्यावरण रक्षण करून हवामान बदल रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने गौरव केला

मुंबई : महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकतेस प्रोत्साहन देऊन महिलांच्या सबलीकरणाचे काम करणाऱ्या ‘स्वयंम शिक्षण प्रयोग’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने पर्यावरण रक्षण करून हवामान बदल रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने गौरव केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे येत्या नोव्हेंबरमध्ये मर्राकेश येथे होणाऱ्या हवामान बदलाविषयीच्या जागतिक शिखर परिषदेत जगभरातील ज्या १३ स्वयंसेवी संस्थांचा विशेष पुरस्कार करून गौरव करण्यात येणार आहे, त्यात ‘स्वयंम शिक्षण प्रयोग’चा समावेश आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून सौर दिवे, सौर चुली यासारख्या स्वच्छ ऊर्जा उत्पादनांची तसेच पर्यावरणस्नेही अशा जलप्रक्रिया व स्वच्छता उत्पादनांची निर्मिती व वितरण करण्याचे जाळे महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांच्या ग्रामीण भागात विणल्याबद्दल या संस्थेला हा बहुमान मिळाला आहे. या माध्यमातून या संस्थेने एक हजाराहून छोट्या महिला उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करून स्वयंपूर्णतेचा व सबलीकरणाचा मार्ग दाखविला आहे.संस्थेच्या या कामांमुळे हवेत होणारे कार्बनचे उत्सर्जन कमी होण्यास मोठा हातभार लागल्याचे ‘युएनएफसीसीसी’ या हवामान बदलाविषयीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने हा पुरस्कार जाहीर करताना नमूद केले आहे. या संस्थेचे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत मोठे काम आहे. भारतात विशेषत: ग्रामीण भागांत अजूनही ८.४१ कोटी लोक अन्न शिजविण्यासाठी व प्रकाशासाठी जळणाचा वापर करतात व त्यामुळे त्यांना श्वसनाचे रोग होतात. या संस्थेच्या कामामुळे दोन लाखांहूनही अधिक महिला आणि कुटुंबे सौर दिवे आणि सौरचुलींचा वापर करून एरवी जळणासाठी जे वापरले गेले असते अशा सुमारे १०० टन लाकडाची दररोज बचत करून हवामान बदल रोखण्यास तेवढाच हातभार लावत आहेत.हवामान बदलाविषयीच्या पॅरिस करारास भारताने ज्या दिवशी औपचारिक संमती दिली त्याच दिवशी भारतातील या संस्थेस त्याच क्षेत्रात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार जाहीर व्हावा, हे विशेष उल्लेखनीय आहे.स्वयंम शिक्षण प्रयोगच्या सहसंस्थापिका प्रेमा गोपालन यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून संस्थेच्या कामाला जागतिक पातळीवर पोंचपावती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.सन १९८९ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या या ‘एनजीओ’ला महाराष्ट्र सरकार, यूएलएड, मिसेओरर, युरोप इत्यादींकडून अर्थसाह्य आणि एचएसबीसी बँक व अलस्टॉम या कंपनीकडून ‘सीएसआर’ निधीही मिळालेला आहे. (विशेष प्रतिनिधी)>महाराष्ट्र सरकारने महिलांना त्यांच्या उपक्रमातून निर्माण होणारी अतिरिक्त सौरऊर्जा ग्रीडला पुरविण्यासही मुभा दिली आहे. देशातील सर्वच राज्यांनी अशी अनुकूल धोरणे स्वीकारली तर भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.-प्रेमा गोपालन, सहसंस्थापक, स्वयंम शिक्षण प्रयोग>या संस्थेने दाखविलेली दिशा व केलेल्या मदतीमुळे आज आमच्या गावातील दोन हजाराहून अधिक कुटुंबे सौरदिवे आणि सौरचुलींचा वापर करीत आहेत.-निता तनवंडे, महिला उद्योजिका, सावरगाव, ता. तुळजापूर