शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पवारांच्या दबावामुळे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणार नाही, 'त्या' पोस्टवर कोल्हेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 19:39 IST

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

ठळक मुद्देस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शरद पवारांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली, असं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचं व्हायरल करण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्टवरून अमोल कोल्हे  संतापले असून, त्यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.  

मुंबईः स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एबीपी माझ्याच्या नावानं ही पोस्ट व्हायरल होत आहे. शरद पवारांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली, असं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचं व्हायरल करण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्टवरून अमोल कोल्हे  संतापले असून, त्यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात बदनामी करण्यात आली असून, आदरणीय पवारसाहेबांना या प्रकरणात गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. पवारसाहेबांचा कलाक्षेत्राविषयीचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी राष्ट्रवादीत आल्यापासून कधीही पवार साहेबांनी हे दाखवा आणि हे दाखवू नका, असं सांगितलेलं नाही. केवळ वडिलधाऱ्यांच्या भूमिकेतून काही अडचण तर नाही ही चौकशी नक्की केली. त्यामुळे ज्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवल्या जात आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही.दररोज रात्री 9 वाजता सोमवारी ते शनिवारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरूच राहणार आहे. कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होतेय, या बातमीत कुठलंही तथ्य नाही. जे कोणी अशा बातम्या पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, अशा उपद्रवी मूल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मी महाराष्ट्र पोलिसांकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडेसुद्धा ही मागणी केलेली आहे. अशा समाजकंटकांना आळा बसला पाहिजे. संभाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवण्यासाठी ही मालिका सुरू असून, ती अव्याहतपणे सुरूच राहणार आहे, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. भाजपानं ही पोस्ट व्हायरल केल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा अशा बनावट क्लिप व्हायरल करत नसते. मालिक बंद करण्यासंदर्भात काही जणांची मतं असू शकतात. परंतु भाजपा असं काहीही  करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.   

टॅग्स :Swarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजी