शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

स्वामी नारायण मंदिरात गाईचा सन्मान, बाईचा अवमान

By admin | Updated: April 30, 2015 15:06 IST

मुंबईतील दादर येथील स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराशी भेदभाव केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - मुंबईतील स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराशी भेदभाव केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. जैन समाजातील संत कार्यक्रमाला उपस्थित होते व महिलांना त्यांच्यासमोर बसता येत नसल्याचे सांगत आयोजकांनी महिला पत्रकाराला तिथे बसण्यास मज्जाव केला. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात महिलेचाच अपमान केला गेल्याने समाजातील सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. 

राज्यांत गोवंश हत्याबंदीचा कायद्याची अंमलबजावणी केल्यानिमित्त स्वामी नारायण मंदिरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वृत्ताकनांसाठी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकार रश्मी पुराणिक या स्वामी नारायण मंदिरात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिल्याचे आयोजकांनी सांगितले होते. यानुसार रश्मी पुराणिक पहिल्या रांगेत जाऊन बसल्या. यानंतर आयोजकांमधील काही जण तिथे आले व त्यांनी रश्मी पुराणिक यांना तीन रांगा सोडून बसायला सांगितले. रश्मी पुराणिक यांनी जाब विचारला असता पहिल्या तीन रांगा या पुरुषांसाठी असतात, महिलांनी या रांगेत बसता कामा नये, तुम्ही मागच्या रांगेत जाऊन बसा असे सांगितले. याविषयी माहिती देताना आयोजक म्हणाले, आमच्या समाजात स्त्री - पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. पण समाजातील काही संत कार्यक्रमात उपस्थित होते. या संतांसमोर महिलांनी बसू नये असा नियम आहे. या भेदभावाकडे रश्मी पुराणिक यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांचे लक्ष वेधले. शेलार यांनीही आयोजकांना महिला पत्रकारांना पहिल्या रांगेत बसू देण्याची विनंती केली. शेलार तिथून निघताच आयोजक पुन्हा तिथे आले व त्यांनी रश्मी पुराणिक यांना तिथे बसण्यास मज्जाव केला. 

स्वामी नारायण मंदिरात महिला व पुरुषांमध्ये झालेल्या या भेदभावाचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तर प्रगतीशील महाराष्ट्रात अजूनही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलू शकलेला नाही, हा प्रकार पुरोगामी राज्यासाठी अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी दिली आहे. मंदिर प्रशासनाने या घटनेशी आमचा संबंध नसून कार्यक्रमाचे आयोजन सांताक्रूझमधील जैन संघाने केले होते असे स्पष्ट केले आहे.

या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध सुरु झाल्यावर सत्कार समारंभाठिकाणी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांना चांगलेच सुनावले. आपण २१ व्या शतकात राहत असून स्त्री - पुरुष भेदभाव करणा-या गोष्टी ताबडतोब बंद करा असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे.  तर सांताक्रूझ जैन संघाने या कार्यक्रमानंतर प्रसिद्धीपत्रक त्यांची भूमिका मांडली आहे. कार्यक्रमाच्या संयोजकांनी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती, यानुसार महिलांनी तिथे बसावेे असे संबंधीतांना सांगण्यात आले होते असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.