शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

“मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी, कारण की...”; राजू शेट्टींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 15:37 IST

Raju Shetti News: अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetti News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू पाटील आत्मक्लेश यात्रा काढत आहेत. शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच या यात्रेदरम्यान राजू शेट्टी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे. 

ऊसाचा मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही. तर यंदाचा ऊस गळीत हंगामा सुरू करून देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तसेच कारखान्यात वजन काटे डिजिटल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी

राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, काही दिवसांआधी राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. सध्याच्या सरकारमध्ये, सत्तेत काहीही उरलेले नाही. सरकारमधून बाहेर पडा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देऊ. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. 

दरम्यान, या आवाहनानंतर बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर काही कयासही राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांच्या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ही पदयात्रा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे