शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गुजरात निवडणुकीमुळे ट्रेन वळविल्याचा संशय - राजू शेट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:00 IST

दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

अहमदनगर : दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.सरकारला ट्रेन चालविता येत नसेल तर बुलेट ट्रेन कशी चालविणार, असा प्रश्न करत या घटनेबाबत ग्राहक मंच तसेच पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. शेवगाव गोळीबारात जखमी झालेल्या शेतकºयांची भेट घेण्यासाठी तसेच घोटण येथील ऊस उत्पादकांच्या मेळाव्यासाठी शेट्टी नगर दौºयावर आले होते. ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.कर्जमाफीचा बट्ट्याबोळशेतकरी कर्जमाफीबाबत आॅनलाइन सर्व्हे करण्याची जबाबदारी सरकारच्या आयटी कंपनीची होती. या कंपनीकडून मुख्यमंत्र्यांच्या पी.ए. शी संबंधित ‘इनोव्हा’ कंपनीला हे काम दिले गेले. त्यांनीही इतर कंपन्या नेमल्या.या कंपन्यांना कर्ज कोणत्या प्रकारचे असते याचेही ज्ञान नव्हते. त्यामुळे बँका या सर्वेक्षणाला वैतागल्या. शेतकºयांची गोपनीय माहिती घेतली गेली. या कंपन्यांमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा झाला, अशी टीका शेट्टी यांनी केली.कारखान्यांत सीसीटीव्ही बसवानगरचे कारखानदार साखर चोरतात म्हणून उतारा घटतो, असा आरोप त्यांनी केला. सर्व कारखान्यांतील इलेक्ट्रॉनिक वजन काटे एकत्रित जोडले पाहिजेत तसेच गेटपासून ते गोदामांपर्यंत सीसीटीव्ही बसवून त्याचे फुटेज शेतकºयांसाठी उपलब्ध केले, तर साखरेची चोरी थांबेल, असे ते म्हणाले. साखर कारखानदार भाजपासाठी पवित्र झाले आहेत. सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते राहिलेले नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी