शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पूर आराखड्याबाबत संशय

By admin | Updated: August 5, 2016 00:44 IST

मुठा नदीतून किती पाणी सोडल्यानंतर शहरात कोणत्या भागात पूर येण्याची शक्यता आहे,

पुणे : मुठा नदीतून किती पाणी सोडल्यानंतर शहरात कोणत्या भागात पूर येण्याची शक्यता आहे, याबाबत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या पूर नियंत्रण आराखड्याबाबत संशयाचे चित्र निर्माण झाले आहे. या आराखड्यात मुठा नदीत ५५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर पूर येण्याची शक्यता वर्तविली असताना प्रत्यक्षात मात्र, ३२ हजार क्युसेक्स पाण्यातच शहरात दोन ते तीन ठिकाणी पाणी शिरले. त्यामुळे कोणत्या स्थितीच्या आधारावर पालिकेने पूर स्थितीचे नियोजन केले असा सवाल उपस्थित केला जात आहे.शहराच्या मध्यवर्ती भागातून मुठा नदी वाहते. खडकवासला धरणातून मुठा नदीत जास्तीतजास्त १ लाख क्युसेक्स पर्यंत पाणी सोडले जाऊ शकते. तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांत या धरणातून जास्तीतजास्त ६० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे विठ्ठलवाडी येथील अनेक सोसायट्या पाण्याखाली जातात. ही बाब लक्षात घेऊन अशा स्थितीमध्ये पूर स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी कशा प्रकारे कार्यपद्धती असावी यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून पूर नियंत्रण आराखडा व आदर्श पद्धती कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यात शहरातील ३३ ठिकाणांना पुराचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले असून, सिंहगड रस्ता परिसर तसेच दत्तवाडी येथील भागात ५५ हजार क्युसेक्सला पुराचे पाणी शहरात घुसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापूर्वी २० हजार क्युसेक्सला या भागांना धोक्याची सूचना देणे आणि ४० हजार क्युसेक्सला त्यांचे स्थलांतरण करणे अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अवघ्या ३२ हजार क्युसेक्स पाण्यातच सिंहगड रस्त्यावरील सहा सोसायट्या तसेच दत्तवाडी मधील ५ घरे पाण्याखाली आल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)