शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आदिवासींच्या निष्कासनास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:42 IST

केंद्राची विनंती मान्य : सुप्रीम कोर्टाने मागविली राज्यांकडून वनजमिनींबाततची माहिती

नवी दिल्ली: सन २००६ च्या वनहक्क कायद्यानुसार ज्या आदिवासी व अन्य वनवासींचे वनजमिनींवरील दावे अंतिमत: फेटाळले गेले आहेत अशा देशभरातील सुमारे ११ लाख आदिवाीस कुटुंबांना वनजमिनींवरून सक्तीने हाकलून लावण्याचा १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या स्वत:च्याच आदेशास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.बंगळुरु येथील वाईल्डलाइफ फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेसह अन्य वनप्रेमींनी केलेल्या याचिकेवर न्या. अरुण मिश्रा, न्या. नविन सिन्हा व न्या. इंदिरा बॅनर्जी हा आदेश दिला होता व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी २४ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील सुमारे २२.५ हजार आदिवासी व वनवासींना वनजमिनींवरून सक्तीने बाहेर काढले जायचे आहे.हा आदेश अन्याय करणारा ठरू शकतो, असे म्हणून केंद्र सरकारने केलेल्या अर्जावर न्यायालयाने आधीचा आदेश तहकूब केला. वनजमिनींवरील दावे निकाली काढण्यासाठी नेमकी कशी प्रक्रिया अवलंबिली गेली आणि हे निर्णय नेमके कोणकोणत्या स्तरावरील प्राधिकाऱ्यांनी घेतले याचा तपशील न्यायालयाने राज्यांकडे मागविला.मात्र आम्ही असा आदेश देण्याचे स्पष्ट संकेत सन २०१६ मध्येच दिले होते. तेव्हा तुम्ही आत्तापर्यत झोपला होतात का, असा सवाल न्यायालयाने केंद्राला केला. याबाबतीत काहीसे दुर्लक्ष झाले, अशी कबुली सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. मात्र ते म्हणाले की, वनहक्क कायद्यात दावा फेटाळला गेला की संबंधितास लगेच वनजमिनीवरून हटविणे हा एकच पर्याय अभिप्रेत नाही. वनसंरक्षण व वनवासींच्या हक्कांचे रक्षण यांची सांगड घालण्यासाठीच हा कायदा केला गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.‘संदिग्ध माहितीच्या आधरे सरसकट कारवाई करणे अन्यायाचे’केंद्र सरकारने अर्जात म्हटले होते की, वनजमिनींसंबंधीच्या दाव्यांच्या निकालासाठी ग्रामसभेपासून जिल्हा समितीपर्यंत त्रीस्तरीय व्यवस्था आहे. राज्य सरकारांनी न्यायालयास जी माहिती दिली आहे त्यांत उल्लेख केलेले दावे या सर्व टप्प्यांनंतर अंतिमत: फेटाळले गेले आहेत किंवा कसे? तसेच या प्रक्रियेत नैसर्गिक न्यायप्रक्रियेचे पालन झाले आहे का, याचे स्पष्टीकरण नाही. त्यामुळे अशा संदिग्ध माहितीच्या आधरे सरसकट कारवाई करणे अन्यायाचे होईल. हे लक्षात घेऊनच न्यायालयाने आधीचा आदेश स्थगित केला