शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या निष्कासनास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:42 IST

केंद्राची विनंती मान्य : सुप्रीम कोर्टाने मागविली राज्यांकडून वनजमिनींबाततची माहिती

नवी दिल्ली: सन २००६ च्या वनहक्क कायद्यानुसार ज्या आदिवासी व अन्य वनवासींचे वनजमिनींवरील दावे अंतिमत: फेटाळले गेले आहेत अशा देशभरातील सुमारे ११ लाख आदिवाीस कुटुंबांना वनजमिनींवरून सक्तीने हाकलून लावण्याचा १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या स्वत:च्याच आदेशास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.बंगळुरु येथील वाईल्डलाइफ फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेसह अन्य वनप्रेमींनी केलेल्या याचिकेवर न्या. अरुण मिश्रा, न्या. नविन सिन्हा व न्या. इंदिरा बॅनर्जी हा आदेश दिला होता व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी २४ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील सुमारे २२.५ हजार आदिवासी व वनवासींना वनजमिनींवरून सक्तीने बाहेर काढले जायचे आहे.हा आदेश अन्याय करणारा ठरू शकतो, असे म्हणून केंद्र सरकारने केलेल्या अर्जावर न्यायालयाने आधीचा आदेश तहकूब केला. वनजमिनींवरील दावे निकाली काढण्यासाठी नेमकी कशी प्रक्रिया अवलंबिली गेली आणि हे निर्णय नेमके कोणकोणत्या स्तरावरील प्राधिकाऱ्यांनी घेतले याचा तपशील न्यायालयाने राज्यांकडे मागविला.मात्र आम्ही असा आदेश देण्याचे स्पष्ट संकेत सन २०१६ मध्येच दिले होते. तेव्हा तुम्ही आत्तापर्यत झोपला होतात का, असा सवाल न्यायालयाने केंद्राला केला. याबाबतीत काहीसे दुर्लक्ष झाले, अशी कबुली सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. मात्र ते म्हणाले की, वनहक्क कायद्यात दावा फेटाळला गेला की संबंधितास लगेच वनजमिनीवरून हटविणे हा एकच पर्याय अभिप्रेत नाही. वनसंरक्षण व वनवासींच्या हक्कांचे रक्षण यांची सांगड घालण्यासाठीच हा कायदा केला गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.‘संदिग्ध माहितीच्या आधरे सरसकट कारवाई करणे अन्यायाचे’केंद्र सरकारने अर्जात म्हटले होते की, वनजमिनींसंबंधीच्या दाव्यांच्या निकालासाठी ग्रामसभेपासून जिल्हा समितीपर्यंत त्रीस्तरीय व्यवस्था आहे. राज्य सरकारांनी न्यायालयास जी माहिती दिली आहे त्यांत उल्लेख केलेले दावे या सर्व टप्प्यांनंतर अंतिमत: फेटाळले गेले आहेत किंवा कसे? तसेच या प्रक्रियेत नैसर्गिक न्यायप्रक्रियेचे पालन झाले आहे का, याचे स्पष्टीकरण नाही. त्यामुळे अशा संदिग्ध माहितीच्या आधरे सरसकट कारवाई करणे अन्यायाचे होईल. हे लक्षात घेऊनच न्यायालयाने आधीचा आदेश स्थगित केला