शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

तहसीलदारांचे निलंबन टळले

By admin | Updated: April 1, 2015 02:05 IST

निवडणूक कामापोटी देय असलेली ३८ कोटींची थकबाकी एप्रिलअखेर अदा करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाने दिल्यामुळे एकीकडे ३६० तहसीलदारांच्या

गजानन मोहोड, अमरावतीनिवडणूक कामापोटी देय असलेली ३८ कोटींची थकबाकी एप्रिलअखेर अदा करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाने दिल्यामुळे एकीकडे ३६० तहसीलदारांच्या डोक्यावरची संभाव्य निलंबनाची टांगती तलवार दूर झाली. तर दुसरीकडे राज्यातील २ हजार १३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठरल्या कार्यक्रमानुसार पार पडण्याचा मार्गही मोकळा झाला. सोमवारी अधिसूचना न काढणाऱ्या तहसीलदारांना निलंबित करून गटविकास अधिकाऱ्यांकडून निवडणुकांचे काम करून घेण्याचा बडगा निवडणूक आयोगाने उगारला होता. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी निवडणूक आयोग आणि ग्रामविकास मंत्रालयाशी चर्चा केली. सर्व तालुक्यांना देय असलेली निवडणुकीची थकबाकी ३० एप्रिलपर्यंत वितरित केली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयातून त्यांना देण्यात आले. त्यामुळे तिढा सुटून दोन हजार १३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना रात्री १२ पूर्वीच आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी काढली.