शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

साखर कारखान्यांच्या जप्तीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 03:01 IST

सहकारमंत्र्यांनी निर्णय मागे न घेतल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणाऱ्या २ साखर कारखान्यांविरोधात काढलेल्या जप्तीच्या नोटिसीला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली असून, तिघा कारखान्यांची सुनावणी सुरू आहे. राज्यातील तेरा कारखान्यांकडे तब्बल ३९३ कोटी ६३ लाख रुपयांच्या रकमेची थकबाकी आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.उसाची एफआरपी आणि दूध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २९ जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्या वेळी साखर आयुक्तांनी उसाची थकीत रक्कम वसूल करण्यास २१ जुलै पर्यंत अवधी मागितला होता. तसेच, रक्कम वसूल न झाल्यास रक्कम न देणाºया कारखान्यांचे जप्ती आदेश घेऊनच आम्ही जाऊ, असे शेट्टी यांनी सांगितले होते. कारखान्यांकडे २९ जून रोजी १९०० कोटी रुपये थकीत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत थकीत रक्कम ८४८ कोटी आणि त्यानंतर २१ जुलै रोजी ७६१ कोटी रुपये रक्कम थकीत होती.जप्तीच्या आदेशाला दिलेली स्थगिती तीन दिवसांत न उठविल्यास स्वाभिमानी शेतकरी सहकारमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पृथ्वीराज जाचक, अ‍ॅड. योगेश पांडे, राजेंद्र ढवाण पाटील, रौनक शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेतली. साखर आयुक्तांनी ३९३ कोटी रुपयांपैकी २०० कोटींची रक्कम सात दिवसांत वसूल होणे अपेक्षित असल्याचे आश्वासन या वेळी दिले.थकबाकी न देणाºया १३ कारखान्यांच्या जप्तीचे आदेश दिले होते. ६४० कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. नोटिशीनंतर २४६ कोटी रुपयांची वसुली झाली. ३९३ कोटी ६३ लाख रुपयांची या कारखान्यांकडे थकबाकी आहे. जप्तीचे आदेश असलेल्या कारखान्यांकडे ७६१ कोटी रुपये थकीत आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी