शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘त्या’ 22 मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 23:40 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला.ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी केलेला हा प्रकार मानवतेची क्रूर थट्टा आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. जिवंत अन् मेलेल्या माणसांनाही जनावरासारखी वागणूक देणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा आणि प्रशासनाचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

.....आणि मुंबई पोलिसांनी माणुसकीचाही बळी घेतला!एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. जे २२ लोक मेले त्यांच्या कपाळावर १ ते २२ असे नंबर लिहिण्याचे शौर्यकाम मुंबई पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे मृतांचे कपाळावर नंबर लिहिलेले हे फोटो पोलिसांनी रिलीज केले आहेत. जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, आम्हाला लाजच उरली नाही...! या मृतांमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असते, कोणाची आई असती, कोणाची बहीण असती तर तुम्ही त्यांच्या कपाळावर नंबर लिहिण्याची हिंमत केली असती का ? २२ मृतदेह होते. त्यांच्या नातेवाईकांनी चेह-यावरूनही ते ओळखले असते. त्यासाठी त्यांच्या कपाळावर नंबर लिहून त्या मृतदेहांची विटंबना करण्याची हिंमत पोलिसांची झालीच कशी? ज्यांनी कोणी हे केले त्याची वर्दी तातडीने काढून घेतली पाहिजे. नियतीनेच ज्यांच्या कपाळी असा दुर्दैवी मृत्यू लिहिला त्यांच्या कपाळावर ते मेल्यावर असा नंबर लिहून विटंबना करण्याची कल्पना तरी पोलिसांच्या मनात कशी येऊ शकते. 

परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेला काँग्रेसच जबाबदार, भाजपाच्या किरीट सोमय्यांनी फोडलं खापरभाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पररळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. गेल्या 15 वर्षांपासून मागणी होत असतानाही काँग्रेस सरकारने या पुलाचा प्रश्न सोडवला नाही, म्हणून ही दुर्घटना घडल्याच्या उलट्या बोंबा सोमय्या यांनी लगावल्या आहेत. दुर्घटना स्थळाला भेट दिल्यावर त्यांनी दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला. मात्र घटनेचे खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडले. तीन वर्षापासून भाजपा मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या समस्यांवर काम करत आहे. मात्र यापुढील काम युद्ध पातळीवर करण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी