शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश जैन विरोधातील बदनामीचा खटला अण्णा हजारेंकडून मागे

By admin | Updated: May 5, 2016 19:04 IST

सुरेशदादा जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मागे घेतला

ऑनलाइन लोकमत
 
जळगाव, दि. 5- माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मागे घेतला. यासंबंधी अण्णांनी केलेला विनंती अर्ज आज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला.
 
अण्णांनी सुरेश जैन यांच्यासंबंधी भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्यानंतर 9 व 10 मे 2003 रोजी सुरेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णांवर आरोप केले होते. त्यानंतर 24 जून 2003 रोजी अण्णांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. गेले 13 वर्षे या खटल्याचे कामकाज सुरू होते. जैन यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांसंबंधी 6 पत्रकारांची साक्ष झाल्यानंतर प्रथमदर्शनी सुरेश जैन यांनी अण्णांची बदनामी केल्याचे सिद्ध होत असल्याचा निर्णय गेल्या 21 मार्च 2013 रोजी न्यायालयाने दिला होता. त्यामुळे या खटल्याच्या अंतिम व महत्त्वाच्य़ा टप्प्यातील कामकाज आता सुरू होणार होते. 
 
अण्णांनी 2003 मध्ये जळगावमधील जो घरकूल घोटाळा उघडकीस आणला होता त्यात सुकृतदर्शनी सुरेश जैन दोषी आढळले असून गेले चार वर्षे त्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक वेळा जामीनासाठी अर्ज केले. परंतू सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून घरकूल घोटाळ्यासंबंधीचा खटला चालविण्याचे आदेश दिल्याने जैन यांची तुरुंगातून सुटका होणे कठीण झालेले आहे. जैन यांनी जळगाव न्यायालयात अण्णांच्या विरोधात दाखल केलेला बदमानीचा खटला यापूर्वीच स्वतःहून मागे घेतला आहे. शिवाय सुरेश जैन यांचे आता वय झालेले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला चालविणे मानवतेच्या दृष्टीने योग्य वाटत नसल्याने हा खटला काढून घेण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. त्यानुसार आज पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात अण्णांच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर व अॅड. मिलिंद पवार यांनी तसा अर्ज दाखल केला. तो दाखल करून घेताना न्यायालयाने जैन यांच्या वकीलांना हरकतीसंबंधी विचारणा केली. जैन यांच्याकडून ना हरकतीचा अर्ज दाखल झाल्यानंतर व दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी हा खटला मागे घेण्यासंबंधीचे आदेश दिले.
 
            या संदर्सभात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "सुरेश दादा जैन यांच्या संबंधी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची विनंती मी सुमारे 13 वर्षापूर्वी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार सरकारतर्फे चौकशी होऊन जैन यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने ते गेल्या 4 वर्षापासून कारागृहात आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपीचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आला असून खटला चालविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत वयोवृद्ध झालेले जैन हे कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय जैन यांनी माझ्या विरोधात जळगाव न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. तो खटला आरोपी जैन यांनी स्वतःहून काढून घेतलेला आहे. त्यामुळे सध्या जैन यांची माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. सध्या माझे वय 78 वर्षे असून वयोमानापरत्वे अधिकचा प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. तसेच राळेगणसिद्धी येथे सातत्याने भेटीसाठी येणारे अभ्यागत व इतर कामांमुळे सदर खटल्याच्या कामासाठी वेळ देणे मला अडचणीचे होत आहे.
 
            अशा परिस्थितीत सुमारे 13 वर्षांपूर्वी आरोपी जैन यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहत जैन यांना न्याय व्यवस्थेकडून योग्य ते प्रायश्चित्त मिळत आहे अशी माझी धारणा झालेली आहे. आरोपी जैन यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा सूडभावना नाही. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. अशा परिस्थितीत सुरेश जैन यांचे झालेले वय, न्यायालयात त्यांच्या विरोधात सुरू असलेला खटला पाहता मानवतेच्या दृष्टीकोनातून मला त्यांच्या विरोधातील हा बदनामीचा खटला चालविणे योग्य वाटत नाही. माझा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनासाठी सुरू आहे. म्हणून आरोपी जैन यांच्या विरोधातील खटला पुढे चालविण्यात मला स्वारस्य नाही."