शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

"धनंजय मुंडेंची विकेट पडण्यापर्यंत..."; राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी मानले CM फडणवीसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:35 IST

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Suresh Dhas on Dhananjay Munde Resign: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. केजचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलं होतं. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावर बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. देवाची गाठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं. 

"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ९० टक्के समाधान झाले आहे. त्यांचा राजीनामा होणं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी होती. सुरेश धस, देशमुख कुटुंबिय, मस्साजोग गाव किंवा केज तालुका एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हते. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला ठेच पोहोचली होती. सभागृहातल्या भाषणात मी संतोष देशमुख यांना कसं मारलं याचं वर्णन केलं होतं. बरेचसे लोक बोलत होते की सुरेश धस अति बोलत आहेत. मला सुद्धा बोलले की तुम्ही अति बोलत आहात. त्यावेळी मी अति बोलत नाही असं सांगितलं होतं. संतोष देशमुख यांना ज्या ज्या गावात फिरवून मारलं होतं त्या सगळ्या गावांमधून मी माहिती घेतली होती," असं सुरेश धस म्हणाले.

देवाची गाठी लागत नाही पण न्याय मिळतो

"काल वायरल झालेल्या फोटोची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पॉझिटिव राहिलेले आहेत. एफआयआर दाखल होण्यापासून ते धनंजय मुंडे यांची विकेट पडण्यापर्यंत खमके मुख्यमंत्री काय असतात हे आम्ही पाहिलेले आहे. देवाची गाठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो," असंही सुरेश धस म्हणाले.

धनंजय मुंडे हे आकाचे आका - सुरेश धस

"संतोष देशमुख यांना एवढ्या क्रूरपणे मारले आहे. त्यामुळे या सर्व लोकांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही घटना झालेली नाही. या प्रकरणातील जे तरुण आहेत, त्यांना वाटत होतं की विष्णू चाटे हा आमचा बॉस आहे आणि आका आमचा बाप आहे. वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा बाप झाला होता. संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन घुले म्हणत होता की, मी तुझा बाप आहे असं म्हण, नाही तर मी पुन्हा मारेन. या सर्वांचे आका हे धनंजय मुंडे होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते," असं सुरेश धस यांनी म्हटलं. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण