शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"धनंजय मुंडेंची विकेट पडण्यापर्यंत..."; राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी मानले CM फडणवीसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:35 IST

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Suresh Dhas on Dhananjay Munde Resign: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. केजचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलं होतं. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावर बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. देवाची गाठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं. 

"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ९० टक्के समाधान झाले आहे. त्यांचा राजीनामा होणं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी होती. सुरेश धस, देशमुख कुटुंबिय, मस्साजोग गाव किंवा केज तालुका एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हते. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला ठेच पोहोचली होती. सभागृहातल्या भाषणात मी संतोष देशमुख यांना कसं मारलं याचं वर्णन केलं होतं. बरेचसे लोक बोलत होते की सुरेश धस अति बोलत आहेत. मला सुद्धा बोलले की तुम्ही अति बोलत आहात. त्यावेळी मी अति बोलत नाही असं सांगितलं होतं. संतोष देशमुख यांना ज्या ज्या गावात फिरवून मारलं होतं त्या सगळ्या गावांमधून मी माहिती घेतली होती," असं सुरेश धस म्हणाले.

देवाची गाठी लागत नाही पण न्याय मिळतो

"काल वायरल झालेल्या फोटोची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पॉझिटिव राहिलेले आहेत. एफआयआर दाखल होण्यापासून ते धनंजय मुंडे यांची विकेट पडण्यापर्यंत खमके मुख्यमंत्री काय असतात हे आम्ही पाहिलेले आहे. देवाची गाठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो," असंही सुरेश धस म्हणाले.

धनंजय मुंडे हे आकाचे आका - सुरेश धस

"संतोष देशमुख यांना एवढ्या क्रूरपणे मारले आहे. त्यामुळे या सर्व लोकांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही घटना झालेली नाही. या प्रकरणातील जे तरुण आहेत, त्यांना वाटत होतं की विष्णू चाटे हा आमचा बॉस आहे आणि आका आमचा बाप आहे. वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा बाप झाला होता. संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन घुले म्हणत होता की, मी तुझा बाप आहे असं म्हण, नाही तर मी पुन्हा मारेन. या सर्वांचे आका हे धनंजय मुंडे होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते," असं सुरेश धस यांनी म्हटलं. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण