शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणाचे वेध ? राहुल गांधींसोबत अर्धातास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 16:59 IST

राहुल गांधींसोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत राज्यातील तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच दुष्काळी स्थितीवर देखील चर्चा झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या सुळे यांना राज्याच्या राजकारणाचे तर वेध लागले नाही, अशी चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव झाली याबाबत मोठी चर्चाही रंगली होती. पण सुप्रिया सुळे यांनी याबाबत खुलासा केला आहे. राहुल गांधींसोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. याबाबत वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

दुसरीकडे राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. परंतु, राहुल पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे आधीच समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी वेगळी भूमिका बजावू शकतात. राहुल यांच्या साथीने सुप्रिया सुळे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊन आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.