शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

...तर पहिल्या दिवशी मी राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:58 IST

या सरकारने नैतिकता ठेवून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुंबई - तंत्रज्ञानाच्या युगात ५० दिवस झाले तरी एक खुनी मिळत नाही, तो फरार असेल, कुठे गेला, एआयमध्ये गेला का? ५० दिवसानंतरही फरार माणूस मिळत नसेल तर यंत्रणा काय करतेय असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. त्याशिवाय धनंजय मुंडे यांनाही राजीनाम्यावरून खोचक टोला लगावला. 

आजच्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यामुळे पक्षाची दररोज हेडलाईन होत असेल, तर नैतिकतेनं मी पहिल्याच दिवशी पक्षाकडे माझा राजीनामा दिला असता, मी इथं पक्ष वाढवायला आली आहे. पक्षाला अडचणीत आणायला नाही. माझ्यामुळे पक्षाची रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेतलं असतं. माझी इन्क्वायरी करा, दूध का दूध और पानी का पानी, होऊ द्या, असं मी केलं असतं असं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर त्या बोलल्या. 

तसेच तंत्रज्ञानाच्या युगात ५० दिवस झाले, तरी एक खुनी मिळत नाही? तो फरार असेल, तर कुठे गेला? एआयमध्ये गेला का? देशमुख कुटुंबीय आणि राज्याची चेष्टा लावलीये का? ५० दिवसांनंतरही फरार माणूस मिळत नसेल, तर यंत्रणा काय करत आहे? हा गंभीर प्रश्न आहे. ५० दिवसांपूर्वी राज्यातील एका मुलाची हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या कुटुंबासाठी न्याय मागत आहे. या सरकारने नैतिकता ठेवून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, बीड प्रकरणावर चॅनलवर रोज एक नवीन पुरावा येत आहे, अजून काय पुरावे पाहिजेत? अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सर्वांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती. या ऐकीव बातम्यांवर ते सर्व जेलमध्ये गेले होते. त्यांना वर्षे-वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. संतोष देशमुख प्रकरणात तर अनेक पुरावे आहेत. सत्तेतले लोकही याबाबतचे आरोप करतायेत. आम्ही विरोधात आहोत, आम्हाला बाजूला ठेवा. पण, सत्तेतील तिन्ही पक्षाचे आमदार यावर बोलत आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण