शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सुप्रीम कोर्टाच्या निकालास ‘एलआयसी’कडून केराची टोपली , हंगामी कर्मचारी कायम करण्याचा आदेश धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:05 IST

देशभरातील विविध विभागीय आणि शाखा कार्यालयांमध्ये अनेक वर्षे बदली, हंगामी किंवा अर्ध वेळ पद्धतीने काम केलेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सुमारे आठ हजार कर्मचा-यांना नोकरीत कायम करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केराची टोपली दाखविली आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरातील विविध विभागीय आणि शाखा कार्यालयांमध्ये अनेक वर्षे बदली, हंगामी किंवा अर्ध वेळ पद्धतीने काम केलेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सुमारे आठ हजार कर्मचा-यांना नोकरीत कायम करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केराची टोपली दाखविली आहे.हे सर्व कर्मचारी एलआयसीच्या विविध कार्यालयांमध्ये शिपाई, हमाल, रखवालदार व पंप आॅपरेटर, लिफ्टमन, सफाई कामगार, झाडूवाले आणि सहायक टंकलेखक या पदांवर १९८५ नंतर अनेक वर्षे काम करीत होते. या कर्मचाºयांना नोकरीत कायम करण्याचा वाद औद्योगिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत तब्बल ३० वर्षे लढला गेला. कर्मचाºयांच्या बाजूने निकाल झाल्यावर, एलआयसी सर्वोच्च न्यायालयात गेली. तेथे अपील, रिव्ह्यू पीटिशन व क्युरेटिव्ह पीटिशन असे उपलब्ध कायदेशीर मार्ग स्वीकारूनही अपयश आल्याने, महामंडळास न्यायालयाचा आदेश न पाळण्यास आता कोणतीही सबब शिल्लक नाही.सर्वोच्च न्यायालयाचा शेवटचा आदेश गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजी दिला गेला होता. त्यानुसार, एलआयसीने या कर्मचाºयांना सहा आठवड्यांत, मागील पगाराच्या फरकाची ५० टक्के रक्कम देऊन नोकरीत सामावून घ्यायचे होते. दरम्यानच्या काळात ज्यांचे निवृत्तीचे वय उलटून गेले असेल, ते कायम नोकरीत होते, असे मानून त्यांना पगाराच्या फरकाची ५० टक्के रक्कम व सर्व निवृत्तीचे लाभ द्यायचे होते.या आदेशास एक वर्ष उलटले, तरी एलआयसीने त्याचे पालन केलेले नाही. ‘इंटक’ प्रणीत ‘आॅल इंडिया नॅशनल लाइफ इन्श्युरन्स एम्प्लॉइज फेडरेशन’ने मध्यंतरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन, निकालाची लगेच अंमलबजावणी करण्याची विनंती केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणून फेडरेशनने ९ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात कन्टेम्प्ट पीटिशन दाखल केले. गेल्या दोन महिन्यांत ते एकदाही सुनावणीस आले नाही. ३० वर्षे लढून मिळविलेला न्यायालयीन आदेशही सरकारी एलआयसी पाळत नसल्याने, हे कर्मचारी हतबल झाले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय