शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

विधिमंडळ अधिकारकक्षेत सुप्रीम कोर्ट आदेशाने अधिक्षेप?

By admin | Updated: October 15, 2015 02:56 IST

विधानसभेने काढलेल्या हक्कभंगाच्या नोटिशीला लेखिका शोभा डे यांनी ठराविक प्रकारचे उत्तर द्यावे

मुंबई : विधानसभेने काढलेल्या हक्कभंगाच्या नोटिशीला लेखिका शोभा डे यांनी ठराविक प्रकारचे उत्तर द्यावे व त्या उत्तराचा वस्तुनिष्ठ विचार करून विधानसभा अध्यक्षांनी डे यांच्यावरील हक्कभंगाची प्रस्तावित कारवाई रहित करण्याचा विचार करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने विधिमंडळ विरुद्ध न्यायसंस्था अशी संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.भारतीय राज्यघटनेने कायदेमंडळ व न्यायसंस्था यांना स्वतंत्र कार्यक्षेत्रे आखून दिली असून उभयतांनी परस्परांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप न करणे अपेक्षित आहे. शोभा डे यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आधी त्यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईस स्थगिती देऊन व आता विधानसभेने हक्कभंग प्रकरण कसे हाताळावे याविषयी सूचना करून राज्यघटनेने घालून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडली तर नाही ना, अशी शंका जाणकार उपस्थित करीत आहेत.महाराष्ट्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांना ‘प्राईम टाइम’ला मराठी चित्रपट दाखविणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. यावर टिका करताना शोभा डे यांनी ‘‘मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये यापुढे पॉपकॉर्न नाही? फक्त दही मिसळ आणि वडापाव. प्राइम टाइमला मराठी चित्रपट पाहताना हे असलेच खाणे चांगले,’’ अशा आशयाचे भाष्य टिष्ट्वटरवर केले.या टिष्ट्वटने शोभा डे यांनी राज्य विधानसभेचा, मराठी भाषेचा व मराठी लोकांचा अपमान केला आहे, अशी भूमिका घेत शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी डे यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. त्यावर विधिमंडळ सचिवालयाने १० एप्रिल रोजी डे यांना नोटिस जारी केली. याविरुद्ध डे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका केली. त्यात महाराष्ट्र सरकारख, सरनाईक व विधानसभा अध्यक्षांनाही प्रतिवादी केले. न्यायालयाने नोटीस काढली पण ती न स्वीकारण्याची भूमिका विधानसभा अध्यक्षांनी घेतली. डे यांना विधिमंडळ सचिवालयाने ज्या दिवशी उत्तर देण्यास बोलाविले होते त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २८ एप्रिल रोजी न्यायालयाने नोटिशीला स्थगिती दिली. बुधवारी न्या. दिपक मिश्रा व न्या. प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण पुन्हा आले तेव्हा न्यायालयाने डे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सी. ए. सुंदरम आणि महाराष्ट्र सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी व निशाींत कटनेश्वरकर यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर दिलेल्या आदेशात खंडपीठाने म्हटले की, हा वाद मिटविण्यास डे यांनी येत्या १५ दिवसांत विधानसभेकडे असे उत्तर सादर करावे की, मी जे काही वक्तव्य केले होते त्याचा विधानसभेच्या कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. डे यांनी तसे उत्तर सादर केल्यावर सक्षम प्राधिकाऱ्यांनी (हक्कभंग समिती) त्यावर वस्तुनिष्ठ विचार करून योग्य वाटल्यास कदाचित ते मान्यही करावे.डे यांनी असे उत्तर सादर केले तरी सभागृहाच्या कामकाजाशी संबंध नसलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा हक्कभंगाची कारवाई करूच शकत नाही या डे यांच्या याचिकेतील मुख्य प्रतिपादनास बाधा येणार नाही व तो मुद्दा खुला ठेवण्यात येत आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. डे यांनी उत्तर सादर केल्यावर विधानसभा त्यावर काय भूमिका घेते हे स्पष्ट झाल्यावर याचिकेची पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)