शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जनतेच्या न्यायालयांमुळे सुप्रीम कोर्ट चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:43 IST

न्यायात हस्तक्षेप : न्यायाधीशांवर येतो दबाव

नवी दिल्ली: गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे खटले न्यायालयात चालून त्यांचे निकाल होण्याआधीच जनतेच्या न्यायालयात हे खटले चालून संशयित गुन्हेगारांविषयी जनमानसात आधीच प्रतिकूल मत तयार करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र चिंता व्यक्त केली.

न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. सुभाष गुप्ता यांच्या खंडपीठाने एका निकालपत्रात म्हटले की, एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात आपला दृष्टिकोन लोकांपुढे मांडून गुन्हा व गुन्हेगार याविषयी जनमानसात संशयाचे ढग निर्माण करण्याची वाढती प्रवृत्ती तपासी यंत्रणांमध्ये दिसून येते. साहजिकच या सर्वाचा खटल्याच्या प्रत्येक टप्प्यास न्यायालयावर अपरिहार्यपणे दबाव येतो आणि म्हणूनच अशा जनतेच्या न्यायालयात चाललेल्या खटल्यांमुळे विधीवत न्यायप्रक्रियेत ढवळाढवळ होण्याची शक्यता असते.

खंडपीठाने म्हटले की, एखाद्या घटनेविषयी जनभावनांनी प्रभावित न होता कायदा व राज्यघटनेनुसार योग्य मार्गाने न्यायनिवाडा करण्याचे काम न्यायालयांना करावे लागते. जनमत तयार होण्यात भावनांचा भाग मोठा असतो. अशा भावनांच्या भरात तयार होणारे जनमत कायद्याला धरून असतेच असे नाही. अशा जनभावनांच्या प्रावाहाविरुद्ध जाऊन नागरिकांच्या हक्कांचे रक्षण न्यायालयांना करायचे असते.छत्तीसगढमधील धन्नू राम वर्मा या गुन्हेगाराने फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलावरील निकालात खंडपीठाने वरीलप्रमाणे चिंतेची बाब नमूद केली. वर्मा याची फाशी रद्द करून त्याऐवजी त्यास जन्मठेप दिली गेली.फाशी ही शिक्षाच नकोयाच निकालपत्रात न्या. कुरियन यांनी दंडविधानात फाशीची शिक्षा असूच नये, असेही मत नोंदविले. केंद्रीय विधी आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी लिहिले की, फाशीची शिक्षा मनमानी पद्धतीने दिली जाऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बच्चन सिंग वि. पंजाब सरकार या खटल्यात ३८ वर्षांपूर्वी निकष ठरवून देण्याचा प्रयत्न केला असला तरी अजूनही फाशीची शिक्षा न्यायाधीशनिहाय व्यक्तिसापेक्ष पद्धतीनेच दिली जात असल्याचे दिसते. त्यामुळे मुळात ही शिक्षा देण्यामागचा हेतूच साध्य होत नाही. त्यामुळे दंड़विधानात फाशी ही शिक्षा कायम ठेवावी का यावर विचार करण्याची वेळ आली आहे. मात्र खंडपीठावरील अन्य दोन न्यायाधीशांनी त्यांच्या या मताशी असहमती दर्शविली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय