शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही?

By admin | Published: August 25, 2016 6:11 AM

सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असून, या पुढे लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे

मुंबई : अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असून, या पुढे लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या विशेषाधिकारावर गंडांतर आणणारा आणि पोलिसांना अमर्याद अधिकार बहाल करणाऱ्या या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा कायदा हा आणीबाणीच्या काळातील मिसा कायद्याची आठवण करून देणारा असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षांनी चालविली आहे, तर या कायद्याच्या माध्यमातून कुठलाही दबाव जनतेवर आणण्याचा हेतूच नसल्याची भूमिका आज राज्य शासनाने स्पष्ट केली.प्रस्तावित महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर १९ आॅगस्ट रोजी टाकण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी आज आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन शासनाची बाजू मांडली. या मसुद्याचा अभ्यास न करताच, टीव्हीवरील चर्चांमधून त्यावर टीका केली जाते आणि अशी चर्चा निकोप नसते, असे बक्षी म्हणाले. हा मसुदा अधिकाऱ्यांच्या पातळीवर तयार करण्यात आला असून, तो अद्याप मुख्यमंत्री वा मंत्र्यांपर्यंत गेलेला नाही, असे सांगतानाच बक्षी यांनी, ‘या पुढे गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी कायद्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यानंतर तो वेबसाइटवर टाकण्यापूर्वी आम्ही प्रेससमोर जाऊ,’ असे सांगितले. ‘या मसुद्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यानंतरच अंतिम मसुदा होईल,’ असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>लग्न सोहळ्याला परवानगीलग्न, वाढदिवस, पूजा आदी कौटुंबिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठीदेखील यापुढे पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असे या मसुद्यात म्हटले आहे. के. पी. बक्षी यांनी याबाबत स्पष्ट केले की, खासगी जागेत हा समारंभ असेल, तर परवानगीची गरज नसेल. मात्र, सार्वजनिक ठिकाणी असेल, तर परवानगी अनिवार्य असेल. >सात सदस्यीय समितीया कायद्यासाठी सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. गृहमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत गृह राज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयकुत आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख हे सदस्य असतील. त्यात विरोधी पक्षाचा एकही सदस्य का नाही, या प्रश्नात बक्षी म्हणाले, अंतर्गत सुरक्षेच्या विषयात विरोधी पक्षाची व्यक्ती शासकीय समितीमध्ये नसते. >... केवळ १२० पोलीसराज्यात आज एक लाख नागरिकांच्या मागे केवळ १२० पोलीस कर्मचारी आहेत. एकीकडे नागरीकरण वाढत असताना पोलीस दलावरील ताण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, या सकारात्मक हेतूने हा कायदा आणला जात असल्याचे के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले. मकोका कायद्याला १९९९ मध्ये विरोध झाला होता, असेही ते म्हणाले. >राज्यातील युती सरकारने अंतर्गत सुरक्षेसंदर्भात मांडलेला नव्या विधेयकाचा मसुदा पूर्णत: असंवैधानिक असून या माध्यमातून राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.-राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते